Monday, December 8, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home आंदोलन

“..तर मनोज जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”, छगन भुजबळ यांची पोलिसांकडे मागणी.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
February 24, 2024
in आंदोलन, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, राजकीय, संपादकीय
0 0
0
“..तर मनोज जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा”, छगन भुजबळ यांची पोलिसांकडे मागणी.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मनोज जरांगेंचं आंदोलन हे मारुतीचं न संपणारं शेपूट आहे, अशी टीका छगन भुजबळ यांनी केली आहे.

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- मागील अनेक दिवसापासून मराठा आरक्षण वाद पेटला आहे. त्यामुळे मराठा विरुध्द ओबीसी नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात आघाडीवर राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे प्रामुख्याने मराठा आरक्षणावर मनोज जरांगे विरुद्ध आक्रमक झाले आहे.

मराठा समाजाला वेगळे आरक्षण देण्यासाठी कायदा मंजूर करण्यात आला आहे. एकमताने या कायदाला मान्यता देण्यात आली. पण मनोज जरांगे यांना हा कायदा मान्य नाही. ते पुन्हा आंदोलनाला लागले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना मी म्हणालो की, हे मारुतीचं शेपूट असून कधीच संपणारं नाही. एकामागून एक मागण्या त्यांच्याकडून पुढे केल्या जातात. मनोज जरांगेंना कायदा आणि नियमां बाबत काहीही कळत नाही. आता त्यांनी रस्ते बंद करण्याचे आणि सामूहिक उपोषन करण्याचं आवाहन केलं आहे. जर या उपोषणामुळं कुणी दगावलं तर मनोज जरांगेंवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा”, अशी मागणी राज्याचे मंत्री छगन भुजवळ यांनी केली आहे.

छगन भुजबळ म्हणाले की, जरांगे यांनी ज्येष्ठ नागरिकांना उपोषणाला बसविण्यास सांगितलं आहे. हा निव्वळ मूर्खपणा आहे. वयोवृद्धांना व्याधी असू शकतात आणि त्यातून ते उपोषणाला बसल्यानंतर काही बरं-वाईट झाल्यास त्याला जबाबदार कोण असणार? उपोषणामुळं कुणी दगावलं, तर याची जबाबदारी मनोज जरांगेवर टाकावी, अशी मागणी छगन भुजबळ यांनी केली. त्यांनी राज्यातील पोलिसांना आवाहन केलं आहे की, जरांगेंच्या उपोषणामुळं जर कुणी मृत्यूमुखी पडल्यास जरांगेवर मनुष्यवधास कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करावा, असेही छगन भुजबळ म्हणाले.

माझी मराठा समाजाला विनंती आहे की, सरकार हळूहळू आरक्षणाचा प्रश्न सोडवत आहे. त्यामुळे जरांगेकडे लक्ष देण्याची गरज नाही. तो कधीही थांबणार नाही. प्रसिद्धीची नशा याला चढलेली आहे. त्यामुळे त्याला सारखी प्रसिद्धी हवी असते. मंचावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि खाली गादीवर तो बसलेला असतो, अशी टीका भुजबळ यांनी केली. तसेच “मनोज जरांगे पाटील आपल्या बोलण्यात सारखा समाज, समाज असं म्हणत असतो. पण आता हेही समोर आले आहे की, १० फेब्रुवारीला सुरू केलेल्या उपोषणा साठी त्याने कोणत्याही समजाचा विचार घेतला नव्हता आणि आता समाजावर सर्व जबाबदारी टाकली आहे. त्यामुळे अशापद्धतीने राज्यात किती दिवस अशांतता ठेवायची, याचाही विचार लोकांनी केला पाहीजे”, असे आवाहन भुजबळ यांनी केले.

सगेसोयरे शब्द कायदा आणि धर्मशास्त्रात नाही
मनोज जरांगे पाटील हे सगेसोयरे शब्द वारंवार वापरत आहेत. पण हा शब्द कायद्याच्या कक्षेत नाही किंवा कुठल्याही धर्मशास्त्रात नाही. त्यामुळे सगेसोयरे अधिसूचना काढली तरी ते न्यायालयात टीकणार नाही. तसेच मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळणार नाहीच, असेही भुजबळ यांनी स्पष्ट केलं.

Tags: मंत्री छगन भुजबळमनोज जरांगेमराठा आरक्षण
Previous Post

25 फेब्रुवारी ला विजय टोंगे यांच्या जिवन संघर्षाचा विजयाचा सातबारा या प्रबोधनपर गौरव ग्रंथाचा प्रकाशन सोहळा.

Next Post

वडनेर येथे पिण्याचे थंड व शुद्ध पाणी केंद्राचे उदघाटन संपन्न, ग्रामपंचायत वडनेर कडून 2500 महिलांना पाणी कॅनचे वितरण.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
वडनेर येथे पिण्याचे थंड व शुद्ध पाणी केंद्राचे उदघाटन संपन्न, ग्रामपंचायत वडनेर कडून 2500 महिलांना पाणी कॅनचे वितरण.

वडनेर येथे पिण्याचे थंड व शुद्ध पाणी केंद्राचे उदघाटन संपन्न, ग्रामपंचायत वडनेर कडून 2500 महिलांना पाणी कॅनचे वितरण.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In