प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा, दि. 20:- सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदानाचा हक्क बजावावा यासाठी जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याच्या दृष्टीने स्वीप (SVEEP) अंतर्गत वर्धा तालुक्यातील गणेशपूर येथे रॅली आयोजित करुन मतदार जनजागृती करण्यात आली.
जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनात महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथील एनएसएसच्या जवळपास 75 विद्यार्थांनी या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता. सुदृढ व प्रबळ लोकशाहीसाठी सर्व पात्र मतदारांनी मतदान करावे, असा संदेश उपस्थित ग्रामस्थांना रॅलीतून देण्यात आला. शिवानी लोटे, दिव्या झा, आशिष रंजन, प्रिया कुमारी या प्रथमच मतदानाचा हक्क बजावण्यास उत्सुक असलेल्या विद्यार्थ्यांनी गणेशपूर येथील ग्रामस्थांना मतदानामध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन केले.
यावेळी शिक्षणाधिकारी तथा स्वीपचे नोडल अधिकारी उत्तम खरात, सहयोगी देवेंद्र तिवसकर, विद्यापिठाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. बालाजी चिरडे, डॉ. विधु खरेदास, विद्यापिठाचे जनसंपर्क अधिकारी श्री. मिरगे व ग्रामस्थ उपस्थित होते.

