Saturday, January 17, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

नागपूर दीक्षाभूमी विश्वस्तात अंतर्गत वाद, समितीत पदावरून भांडणे सुरू, आंबेडकरी समाजात संताप.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 18, 2024
in देश विदेश, धर्म, नागपुर, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
नागपूर दीक्षाभूमी विश्वस्तात अंतर्गत वाद, समितीत पदावरून भांडणे सुरू, आंबेडकरी समाजात संताप.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

पल्लवी मेश्राम, उपसंपादक नागपूर

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखों अनुयायांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पवित्र दीक्षाभूमीवर समता तसेच सामाजिक क्रांतीची मुहूर्तमेढ रोवली आणि त्यामुळेच संपूर्ण समाज प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकला. ही दीक्षाभूमी अवघ्या विश्वासाठी त्याग, शांती आणि मानवतेची प्रेरणा देणारी आहे. लाखों करोडो आंबेडकरी नागरिकांची उर्जास्थान असलेल्या दीक्षाभूमी आज वेगळ्या कारणाने चर्चेत आहे. सध्या दीक्षाभूमी संस्थेत सर्वकाही आलबेल नसल्याचे चित्र दिसून येत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या हयातीत कुठल्याही संस्थेत घरातील सदस्यांना विश्वस्त म्हणून घेतले नव्हते. किंबहुना ते या विरोधातच होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्याच्या संस्थेत त्यांनी नियुक्त केलेले विश्वस्त होते. हळूहळू काळ लोटत गेल्यानंतर संस्थेत पदावरून भांडणे सुरू झाली.

त्यांनी स्थापन केलेल्या रिपब्लिकन पक्ष (RPI), भारतीय बौद्ध महासभा असो की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या शिक्षण संसंस्थेत ही भांडणे सुरू झाली आणि आताही सुरू आहेत. नागपूरच्या दीक्षाभूमी समितीतही पदावरून भांडणे सुरू आहेत. माजी राज्यपाल रा.सु. गवई यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागेवर सुपुत्र डॉ. राजेंद्र गवई यांना घेण्यात आले. सदानंद फुलझेले यांच्या जागेवर त्यांचे सुपुत्र सुधीर फुलझेले यांना घेतले. नंतर अंतर्गत वादानंतर त्यांनी राजीनामा दिल्याचं कळते. समिती ही सद्यस्थितीत दीक्षाभूमीवर कुठले प्रकल्प राबविते हे माहीत नाही. माध्यमांना त्यांनी यासंदर्भात कधीही माहिती दिलेली नाही. धम्मचक्र प्रवर्तन दिनापूर्वी समितीचे विश्वस्त माध्यमांना कार्यक्रमासंदर्भात माहिती सांगतात. त्याव्यतिरिक्त कुठलीही माहिती सांगितली जात नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं व्हिजन हे मोठं होत. त्यांना दैववाद मान्य नव्हता. त्यांच्या विचारांना अनुसरून समिती ही हल्ली कुठलेही कार्य करीत नाही असे चित्र दिसून येते आहे. सद्यस्थितीत तिथे अंतर्गत वाद सुरू आहे. सध्या दीक्षाभूमी समितीचे अध्यक्ष म्हणून भदंत आर्य सुरई ससाई नागार्जुन आहेत. त्यांचं इतर सदस्य ऐकत नाही. भन्तेजीच्या विरोधात हे सदस्य आहेत. समितीत घराणेशाही आणि अंतर्गतवाद यामुळे खरंच दीक्षाभूमीचं योग्य संचालन होते का? हा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आंबेडकरी समाजात याविषयी रोष आहे. यापूर्वी समितीच्या विरोधातही आंदोलने झाली आहेत. सुधीर फुलझेले हे आता डॉ. आंबेडकर मॅनेजमेंट कॉलेज सांभाळतात, अशी माहिती आहे. ते अंतर्गत राजकारणाचे बळी ठरले अस बोललं जातंय.

Tags: डॉ. बाबासाहेब आंबेडकरदीक्षाभूमी नागपूरनागपूरनागपूर दीक्षाभूमी वादभारतीय बौद्ध महासभा
Previous Post

वर्धा: न्यायालयीन अधिकारी व कर्मचाऱ्यायांचे रक्त तपासणी शिबिराचा आयोजन.

Next Post

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

January 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Dec    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In