अनिल कडू विशेष प्रतिनिधी हिंगणघाट
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- राष्ट्रीय महामार्ग पासून बोपापुर गांवला जोडणारा मार्ग सततच्या पावसामुळे वाहून गेला. ज्यामुळे हा मार्ग बंद पड़ला असून मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. बोपापुर गांवाला जोडणारा रस्ताचे काम उन्हाळ्यात केल्या गेले होते. परंतु बांधकाम करणाऱ्या ठेकेदाराने रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्या मुळे केवळ १५ दिवसात या मार्ग वर खड्डे पडले आहे. यावर संबधीत ठेकेदार आणि बांधकाम विभागाचे अधिकारिच्या कार्यप्रणाली वर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. आणि त्यांच्यावर कठोर कारवाही करन्याची मागणी करण्यात आली आहे.
बोपापुर जोडणारा मार्गचे काम अत्यंत निकृष्ट दर्जा चे आहे. या मार्ग वरील उखडलेले डाबरला काढण्या ऐवजी त्यावर खड़ीकरण केल्या गेले. या कामात थातूरमातूर काम झाल्याने याची तक्रार अनेक वेळा करण्यात आली. परंतु लोकप्रतिनिधि और संबधित अधिकारिच्या दुर्लक्षा मुळे शेवटी जनतेचा रोष त्यांच्यावर वाढला. वारंवार तक्रार करूनही लोकप्रतिनिधि यांच्याकडे दुर्लक्ष करून सामान्य लोकांना संताप देनारे ठरत आहे. ठेकेदार ने काम पूर्ण केले, परंतु पहिल्याच पावसात या सड़के वर खड्डे पड़ले. या प्रमाणे या रस्ताचे काम निकृष्ट दर्जेचे झाल्याने रहदारी प्रभावित झाली आहे.
मागील वर्षाच्या पावसात या पुल वरील मार्ग तीन वेळा वाहून गेला होता. परिणाम स्वरूप बोपापुर वासियांना हिवरा मार्ग ने हाइवे पर्यंत जाण्याची नामुष्की पत्करावी लागली. या मार्ग वरील शेतीचे काम करण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागली होती. नाल्यातुन पानी वाहण्याची क्षमता लक्षात घेऊन इथे पुलाचे पाईप मोठे आणि जास्त संख्येत होने गरजेचे होते. परंतु याकडे दुर्लक्ष करून इथे छोटे आकार चे पाईप ताथुर मातुर रीतीने बसविण्यात आले. ज्यामुळे या पुला वरून पानी वाहने सुरू आहे आणि या वर्षी देखील अर्धवट कामामुळे मागच्या वर्षी प्रमाणे या वर्षी ही हा मार्ग वाहून गेला आहे. ज्यामुळे हे काम करनारे ठेकेदार आणि लोकप्रतिनिधि च्या कार्यक्षमते वर बोपापुर वासियांनी नाराजी व्यक्त केली आहे.

