Friday, December 5, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home मनोरंजन

छ. संभाजी नगर येथे राज्यस्तरीय मानवतावादी कवि संमेलनाचे; महापुरुषांचा मानवतावाद समजून घेतला पाहिजे: डॉ. धोंडोपंत मानवतकर

मनवेल शेळके by मनवेल शेळके
August 28, 2024
in मनोरंजन, मराठवाडा, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
छ. संभाजी नगर येथे राज्यस्तरीय मानवतावादी कवि संमेलनाचे; महापुरुषांचा मानवतावाद समजून घेतला पाहिजे: डॉ. धोंडोपंत मानवतकर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

छत्रपती संभाजीनगर जिल्हा प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन छ. संभाजी नगर:- “सबका मंगल हो.!, सबका कल्याण हो.!” हे तथागताच्या विचारातून आणि त्यांच्या नंतर सर्वच महापुरुषांच्या कार्यातून, विचारातून आलेले संपूर्ण मानवजातीचे हित, ‘हाच खरा मानवतावाद आहे; मात्र त्यांच्या विचारातला आणि कृतीतला मानवतावाद आम्ही चिकित्सकपणे समजून घेतला पाहिजे, असे प्रतिपादन प्रसिद्ध साहित्यिक डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी कविसंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी केले.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०४ व्या जयंती निमित्त २५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता छत्रपती संभाजीनगर येथील नागसेनवन परिसरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर लॉ कॉलेज महात्मा फुले सभागृहात “मानव प्रतिष्ठा-सृजनता साहित्य परिषद, महाराष्ट्रच्या वतीने ‘राज्यस्तरीय मानवतावादी कविसंमेलनाचे’ आयोजन करण्यात आले होते.

या उद्घाटकीय भाषणात डॉ.धोंडोपंत मानवतकर पुढे म्हणाले की, अण्णाभाऊंच्या आयुष्यात कोणतीच परिस्थिती पुरक नसताना त्यांनी अहोरात्र संघर्ष करत सामाजिक परिवर्तनासाठी आपले संपूर्ण आयुष्य खर्ची घातले, यातून वेळ काढून वास्तव परिस्थितीवर आधारित कथा, कादंबऱ्या, नाटके, लोकनाट्ये, पोवाडे, लावणी, प्रवासवर्णन अशी सत्तर जवळपास पुस्तके लिहिली. त्यांनी आपल्या साहित्यात सर्व जातीधर्माच्या उपेक्षित, बहिष्कृत लोकांना नायक, नायिका बनवले आहे. समाज व्यवस्थेच्या प्रवाहाबाहेर असणारा दुर्लक्षित, उपेक्षित माणूस आपल्या साहित्याच्या केंद्रस्थानी उभा करून मानवतावाद जपला आहे. परंतु आज आमच्या सुशिक्षित लोकांचे सगळे प्रश्न सुटल्यामुळे ते समाजकार्यात किंवा साहित्यिक कार्यात सहभागी होत नाहीत, ही खंत आहे. “आम्हीही समाजाचे काही देणे लागतो” हा विचार सर्वांनी अंगिकारून समाज कार्यात सहभागी झाले पाहिजे, असा विचार डॉ.धोंडोपंत मानवतकर यांनी मांडला.

या कार्यक्रमारंभी मान्यवरांच्या हस्ते साहित्यसम्राट अणाभाऊ साठे व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मान्यवरांच्या सत्कारानंतर प्रा.डॉ.कोंडबा हटकर यांनी आपल्या प्रास्ताविकातून साहित्यरत्न अणाभाऊ साठे यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉ. धोंडोपंत मानवतकर यांच्या उद्घाटकीय भाषणानंतर मानव-प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रप्रकाश शिंदे यांनी साहित्य चळवळीची भूमिका विषद करताना सांगितले की, साहित्य परिषदेच्या अनेक संमेलनाद्वारे साहित्यिकांना एकत्र आणून त्यांचा समाजकार्यात प्रत्यक्ष सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न राहणार आहे. जेणेकरून परिवर्तनाच्या कार्यात त्यांच्या विद्वतेचा उपयोग समाजाला होईल.

या उदघाटन सत्राचे अध्यक्ष आंबेडकरवादी लेखक भीमराव सरवदे यांनी अध्यक्षीय समारोपात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि साहित्य सम्राट अणाभाऊ साठे यांच्या वैचारिक भूमिकांचा उहापोह करून कविता लेखनाच्या भूमिकेबाबत उपस्थित कविंना मार्गदर्शन केले. उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सुभाष गवळी यांनी केले.

यावेळी सदर साहित्य संमेलनात उपस्थित मान्यवरांचा उचित सन्मान, आंबेडकरी साहित्यिक विद्रोही कवी सुनिल गायकवाड पुणे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जेष्ठ साहित्यिक भोगवटाकार सुदामजी मगर संभाजी नगर हे या प्रसंगी उपस्थित होते. दुसऱ्या सत्रात ४ वाजता कवी राजू वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या ‘राज्यस्तरीय मानवतावादी कवि संमेलनात’ महाराष्ट्रातील नामवंत कवींनी सहभाग नोंदवला होता. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.विठ्ठल स.जाधव यांनी केले तर धन्यकुमार टिळक यांनी कवींचे आभार मानले. या कार्यक्रमास साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मानव-प्रतिष्ठा सृजनता साहित्य परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Tags: छ. संभाजी नगरछ. संभाजी नगर येथे राज्यस्तरीय मानवतावादी कवि संमेलनाचे; महापुरुषांचा मानवतावाद समजून घेतला पाहिजे: डॉ. धोंडोपंत मानवतकर
Previous Post

नागपूर येथे आर्य समाज दयानंद भवन यांच्यातर्फे आयोजित वेद प्रचार समारोह संपन्न.

Next Post

गोपालकाला दहीहंडी उत्सव के पावन अवसर पर स्नाप डांस अकादमी बल्लारपुर द्वारा गरबा डांडिया क्लासेस फ्री डांस वॉर्कशॉप का आयोजन.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
गोपालकाला दहीहंडी उत्सव के पावन अवसर पर स्नाप डांस अकादमी बल्लारपुर द्वारा गरबा डांडिया क्लासेस फ्री डांस वॉर्कशॉप का आयोजन.

गोपालकाला दहीहंडी उत्सव के पावन अवसर पर स्नाप डांस अकादमी बल्लारपुर द्वारा गरबा डांडिया क्लासेस फ्री डांस वॉर्कशॉप का आयोजन.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In