Sunday, December 7, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home देश विदेश

आंबेडकरांचीही मान शरमेने खाली गेली असती: दक्षिण चित्रपट सुपरस्टार विजय थलपती यांचं प्रतिपादन.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
December 7, 2024
in देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, राजकीय
0 0
0
आंबेडकरांचीही मान शरमेने खाली गेली असती: दक्षिण चित्रपट सुपरस्टार विजय थलपती यांचं प्रतिपादन.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

महाराष्ट्र संदेश न्युज प्रतिनिधी

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- दक्षिण भारतीय चित्रपट सृष्टीतील सुपरस्टार विजय थलपती याने काही दिवसापूर्वी राजकारणात प्रवेश करत तमिळनाडू राज्याच्या राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली होती. त्यामुळे सत्ताधारी पक्ष आणि विरोधकाना आतापासून धडकी भरली आहे. विजय थलपती यांनी 2026 मध्ये होणाऱ्या राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी करत तयारी सुरू केली आहे.

काल 6 डिसेंबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त ‘आंबेडकर: द लिडर फॉर ऑल’ या पुस्तकाचे नुकतेच प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता. या प्रकाशन सोहळाला तमिळनाडू मधील प्रसिद्ध दलित नेते थोल तिरुमावलावन यांनाआमंत्रित करण्यात आले होते. पण अन्य वेळी त्यांनी उपस्थित राहण्यास नकार दिला. थोल तिरुमावलावन हे व्हिसीके पक्षाचे नेते असून त्यांचा पक्ष राज्यातील सत्ताधारी द्रमुकचा सहयोगी पक्ष आहे. आंबेडकर यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाला सत्ताधारी पक्षाच्या नेत्याने अनुपस्थिती दर्शविल्यानतर अभिनेता विजय थलपती यांनी जोरदार टीका केली आहे.

विजय थलपतीने आपल्या भाषणात मणिपूरमधील हिंसाचाराचाही उल्लेख करत मणिपूरबाबत केंद्र सरकारने योग्य भूमिका नसल्याचा आरोप करत केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. तसेच तमिळनाडूमध्ये दलितांच्या पाण्याच्या टाकीत मानवी मलमूत्र मिसळल्याच्या प्रकरणावरून त्याने राज्यातील सत्ताधारी द्रमुकवरही जोरदार टीका केली. विजयने तमिलगा वेत्री कळघम या राजकीय पक्षाची स्थापना केली असून 27 ऑक्टोबर रोजी लाखोंच्या जनतेसमोर पहिली जाहीर सभा घेतली होती.

दरम्यान दलित नेते थोल तिरुमावलावन हे द्रमुकच्या दबावामुळेच पुस्तक प्रकाशन सोहळाला आले नाहीत, असाही आरोप विजयने केला. विजयचे राजकारण हे सत्ताधारी द्रमुकच्या विरोधात आहे. त्यामुळे आपल्या घटक पक्षाचे नेते विजयसह एकत्र कार्यक्रमाला दिसल्यास त्याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो, तसेच आघाडी सरकारला धक्का बसू शकतो, त्यामुळे थोल तिरुमावलावन हे प्रकाशन सोहळ्यापासून दूर राहिले, असे सांगितले जाते.

आंबेडकरांचीही मान शरमेने खाली गेली असती: विजय आपल्या भाषणात म्हणाला, ‘मणिपूरमध्ये काय घडत आहे, हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे. केंद्रातील सरकार तेथील नागरिकांसाठी काहीही करत नाही. तर तमिळनाडूमधील सरकार तरी काय करतय? वेंगवायाळमध्ये दलित वापरत असलेल्या पाण्याच्या टाकीत मानवी मलमूत्र मिसळण्यात आले. पण या प्रकरणातही राज्य सरकारकडून काही हालचाल झाली नाही. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर हयात असते तर त्यांचीही मान शरमेने खाली गेली असती.

लोकशाही टिकवायची असेल तर संविधानाचे रक्षण झाले पाहीजे. ही जबाबदारी आता जनतेलाच उचलावी लागणार आहे. आंबेडकर आज असते, तर आजच्या भारताबद्दल त्यांनी काय विचार केला असता, असा प्रश्न मला पडतो. भारताचा जर विकास करायचा असेल तर लोकशाहीचे टिकणे फार गरजेचे आहे. त्यासाठी संविधानाचे रक्षण करावे लागेल आणि ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असेही अभिनेता विजय यावेळी म्हणाला.

निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने निवडणुका: नुसत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत मतदारांनी संशय व्यक्त केला असून निवडणूक आयोगावरील विश्वास उडत चालला आहे. याबाबत बोलताना विजय म्हणाला, ‘निवडणुका या मुक्त आणि पारदर्शक वातावरणात होणे गरजेचे आहे. यासाठी निवडणूक आयुक्तांची नेमणूक ही सर्वांच्या सहमतीने झाली पाहीजे. निष्पक्ष आणि पारदर्शक निवडणुका होणे, ही लोकशाहीची महत्त्वाची प्रक्रिया आहे. मी हे म्हणत नाही की, पक्षपाती पद्धतीने निवडणुका होत आहेत. पण आज भारतातील जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरील विश्वास उडत चालला आहे. तो अबाधित राहावा, यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न करणे गरजेचे आहे.’

Previous Post

बल्लारपूर तालुक्यातील हड्डस्ती गावामध्ये अंदाजे 12 करोड रुपयाचे रोड, पुलियाचे काम गेल्या अनेक दिवसापासून सुरु असून संपूर्ण काम हे निकृष्ट दर्जाचे.

Next Post

नागपूर मेडिकल कॉलेज मध्ये रुग्णाच्या जीवाशी खेळ? मेडिकल कॉलेज मध्ये मोठ्या प्रमाणात बनावट औषधांचा पुरवठा.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
नागपूर मेडिकल कॉलेज मध्ये रुग्णाच्या जीवाशी खेळ? मेडिकल कॉलेज मध्ये मोठ्या प्रमाणात बनावट औषधांचा पुरवठा.

नागपूर मेडिकल कॉलेज मध्ये रुग्णाच्या जीवाशी खेळ? मेडिकल कॉलेज मध्ये मोठ्या प्रमाणात बनावट औषधांचा पुरवठा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In