महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन उत्तर प्रदेश:- येथील प्रयागराजमध्ये आयोजित करण्यात आलेल्या महाकुंभ मेळ्यात भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या भीषण आगीमध्ये अनेक तंबू आणि इतर साहित्य पूर्णत्व जळून राख झाले आहे. त्यामुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे.
प्रयागराजमध्ये महाकुंभ येथील शास्त्री पुलाखाली असलेल्या पंडालला ही भीषण आग लागली. रविवारी सेक्टर 19 मध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्याने आग लागली. या आगीत 18 छावण्या जळून खाक झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. आग कशामुळे लागली यांचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
महाकुंभ मेळा परिसरातील सेक्टर-19 येथील पंतून ब्रिज 12 येथे असलेल्या अखिल भारतीय धार्मिक संघटनेच्या श्रीकरपत्री धाम वाराणसीच्या शिबिरात आग लागली. कॅम्पमध्ये ठेवलेल्या एलपीजी सिलिंडरलाही आग लागली. मधूनमधून सिलिंडर फुटत होते. या अपघातात 19 सिलिंडरचा स्फोट झाला. या आगीत 18 छावण्या जळून खाक झाल्या.
महाकुंभ परिसरात आग लागल्याच्या काही क्षणातच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. पोहोचले. प्रयत्नानंतरही आग विझवता आली नाही. दोन-तीन छावण्यांमध्ये आग वाढल्याने तीन सिलिंडर फुटल्याचा आवाजही ऐकू आला. ही आग 100 चौरस मीटरपेक्षा जास्त परिसरात पसरली. आगीच्या ज्वाला 30 फूट उंच होत होत्या. अग्निशमन दलाचे पथक आग विझवण्यात व्यस्त आहे. या गोंधळात अधिकारीही घटनास्थळी धावताना दिसत आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेही महाकुंभ परिसरात आहेत.
महाकुंभला लागलेल्या भीषण आगीत 25 हून अधिक तंबू जळून खाक झाल्याचे बोलले जात आहे. मुख्य रस्त्यावरील लोखंडी पुलाजवळ ही आग लागली. आग विझवण्यासाठी डझनहून अधिक अग्निशमन बंबांचा वापर करण्यात आला. ज्या ठिकाणी आग लागली त्या ठिकाणाजवळ रेल्वे पूल असल्याने रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली आहे.

