तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी परिसरातील नागरिकांनी तहसीलदार यांना निवेदन.
मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
सिरोंचा तालुक्यातील नारायणपूर ते रंगय्यापल्ली पर्यंतचा रस्ता तीन वर्षापासून अपूर्ण आहे. या संबंधित विभागाने रस्ता खोदून ठेवला असला तरी अद्याप काम पूर्ण झालेले नाही. विशेषतः, पाच दिवसांनी केवळ एकदाच पाणी टाकले जात असतात.त्यामुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे.आणि ये -जा करण्याऱ्याची जीव मुठीत घेऊन ये -जा करावे लागते.
ग्रामस्थांनी प्रश्न उपस्थित केला आहे की जर काम सुरू करायचे नव्हते, तर रस्ता खोदण्याचे कारण काय? या परिसरातील शालेय विद्यार्थी, शेतकरी व ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, अपघात व आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.
सदर ग्रामस्थांनी माननीय तहसीलदार साहेब, तहसील कार्यालय सिरोंचा येथे यासंबंधीचे निवेदन सुद्धा देण्यात आले आहे. जर लवकरात लवकर रस्त्याचे काम सुरू झाले नाही, तर सर्व परिसरातील नागरिक एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन छेडतील, असा इशारा ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.
तहसीलदार यांना निवेदन देताना रंगय्यापल्ली ग्रामपंचायतचे उपसरपंच .बापूजी अतकुरी व नागरिक उपस्थित होते.

