मधुकर गोंगले, गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी. मो. नं. 9420751809.
अहेरी:- तालुक्यातील राजाराम येथील प्रभाग क्रमांक ०३ दलित वस्तीत मध्ये मागील कित्येक वर्ष्यापासून कमी दाबाचा विद्युत पुरवठा होत असून या विद्युत समस्या संदर्भात ग्रामपंचायत पंचायत कार्यालय येथून ठराव घेऊन नवीन जनित्र करीता विद्युत विभागाकडे पाठपुरावा केले असता नवीन जनित्र मंजुरी करण्यात आले आहे तसेच जमीन सुद्धा उपलब्ध करून देण्यात आले आहे. मात्र विद्युत महावितरण यांचे दुर्लक्षपणामुळे जनित्र बसविण्यात हयगय करीत आहेत.दलित वस्तीत मंजुरी विद्युत जनित्र बसवून दलित वस्तीतील विद्युत समस्या दूर करण्यात येण्यास शिवसेना अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांच्या कडे निवेदनातुन मागणी केली आहे.
दलित वस्तीत अनेक वर्षांपासून कमी दाबाचे विद्युत पुरवठा होत असल्याने सद्याचे उन्हाळ्याचे दिवसात पंखा, कुलर, पाण्याची मोटर, इतर उपकरणे चालनेही कठीण होऊन उन्हाळ्याच्या दिवसात समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
विद्युत वितरण कंपनी मात्र दर महिन्याला विद्युत बिल तर बरोबर घेतात मात्र विद्युत सेवा सुरळीत का करत नाही. असा सवाल दलित वस्तीतील विद्युत धारकांना पडत आहे.कमी विद्युत दाबाचे विद्युत पुरवठा होत असल्याने या वस्तीतील अनेक विद्युत उपकरणे अनेकदा जळून निकामी झाले आहे.अश्या गंभीर विषय घेऊन शिवसेना अहेरी विधानसभा प्रमुख संदीप कोरेत यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदन देताना भिमराव गोंगले, राजेश दुर्गे, मधुकर गोंगले, विलास दुर्गे, संतोष दुर्गे, व्यंकटेश गोंगले, हनमंतू झाडे, लक्ष्मण बामनकर, धनंजय शेगावकर,शेखर गोंगले,इत्यादी दलित वस्तीतील नागरिक उपस्थित होते.