मधुकर गोंगले, उप संपादक
मो. नं. 9420751809.
अहेरी तालुक्यातील
गोलाकर्जी येथील *अशोक मडावी* यांचा १३ वर्षीय मुलगा *नागेश अशोक मडावी* याचा सर्पदंशामुळे दुर्दैवी मृत्यू झाला. आज सकाळी सुमारास तो जंगलात (काटवेल) आणण्यासाठी गेला असता, त्याला साप चावल्याची घटना घडली. मात्र सर्पदंश झाल्याचे त्याच्या लक्षात न आल्याने तो घराकडे परत निघाला. जंगलातून घरापर्यंत पोहोचण्यासाठी त्याला दीड ते दोन तास लागले.
घरी आल्यानंतर त्याने आपल्याला साप चावल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी तातडीने त्याला राजाराम दवाखाना, येथे उपचारासाठी नेले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या अचानक घडलेल्या घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
ही घटना *माजी पंचायत समिती सदस्य हर्षवर्धन बाबा आत्राम* यांना कमलापूर दौऱ्यावर असताना समजताच त्यांनी कोणताही विलंब न करता नागेशच्या घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली व त्यांचे सांत्वन केले. यावेळी त्यांनी आर्थिक मदत देखील केली.
या प्रसंगी तालुका अध्यक्ष नागेश मडावी, प्राचार्य रतन दुर्गे, संबय्या करपेत, जावेद अली, सूरज जाधव, तिरुपती मडावी, योगेश तलांडे, आकाश राऊत तसेच गावातील नागरिक उपस्थित होते.
या दु:खद घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
—
*🕯️ श्रद्धांजली*
नागेश अशोक मडावी या चिमुकल्या जीवाचा सर्पदंशामुळे झालेला मृत्यू हे एक अत्यंत वेदनादायक सत्य आहे. त्याच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
– ग्रामस्थ, गोलाकर्जी

