अनेक वर्षापासून वंचितने लढलेल्या आंदोलनाला यश.
मधुकर गोंगले, उपसंपादक
मो. नं. 9420751809.
*गडचिरोली==*
गडचिरोली ग्रामपंचायत असतांना शासनाने गडचिरोली शहरातील गोकुलनगर व इंदिरानगर येथे १८१ गरजू नागरिकांना बेघर बांधून दिले होते त्यावेळी केवळ १० ते १२ लाभार्थ्यांना पट्टे देण्यात आले होते, पंरतु उर्वरितांना आजतागायत पट्टे मिळाले नव्हते, बेघरधारक व अतिक्रमण धारकांना जागेचे पट्टेे देण्यात यावे यासाठी वंचित बहुजन आघाडीचे पूर्व विदर्भ समन्वयक बाळू टेंभुर्णे यांच्या नेतृत्वाात आंदोलन, आमरण उपोषण करून वेळोवेळी निवेदन देऊन पाठपुरावा करण्यात आला होता आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांची भेट घेऊन सर्व परिस्थिती समजाऊन सांगत निवेदन देण्यात आले यावेळी त्यांनी लगेच तहसिलदारांना पट्टे वाटप करण्याचे आदेश दिले.
येणा-या २३ सप्टेंबर पासून पट्टे देण्यात येणार असल्याचे महसूलमंत्र्यांनी सांगितले तसेच शहरातील अतिक्रमण धारकांना सुद्धा लवकरच पट्टे देण्यात येतील असेही शिष्टमंडळाला आश्वासन दिले.
महसूल मंत्र्यांची भेट घेणा-या बाळू टेंभुर्णेे यांच्या नेतृत्वातील शिष्ठमंडळात जेष्ठ नेते जी के बारसिंगे, तुळशिराम हजारे, विलास केळझरकर, कवडू दुधे, सोमनाथ लाकडे, चॉंदखा पठाण, राजू कुळमेथे, यादव मेश्राम, संदिप सहारे, जगदिश कुळमेथे, विश्वनाथ बोदलकर, मनिषा वानखेडे आदि उपस्थित होते.

