हनिशा दुधे चंद्रपूर उपजिल्हा प्रतिनिधी मो.9764268694
राजुरा .. – समाजामध्ये परिवर्तन घडवायचे असेल तर महापुरुषांची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालत समाजप्रबोधन आणि समाजहिताचे कार्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सन्मान होणे ही अत्यंत अभिमानाची बाब आहे,” असे प्रतिपादन इंदू मिल स्मारकाचे प्रणेते तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांनी केले. ज्ञानदीप सामाजिक विकास संस्था, नाशिक महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार” वितरण सोहळा नाशिक येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी आनंदराज आंबेडकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
या कार्यक्रमात समाजाभिमुख कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना एकूण ७० राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कारार्थींना सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, फ्रेम व गोल्ड मेडल देऊन सत्कार करण्यात आला.त्या मध्ये आयु.धर्मुजी किसन नगराळे रा.बामणवाडा ता.राजुरा जिल्हा चंद्रपूर यांच्या संस्थेच्या नियम प्रमाणे सामाजिक कार्य व पर्यावरण त्यांना भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार ” देऊन गौरविण्यात आले.संस्थेच्या या सामाजिक उपक्रमाचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल आठवले अध्यक्ष सूत्रसंचालन अश्विनी पुरी तर आभार प्रदर्शन संस्थेचे सचिव मिलिंद कळवणकर यांनी मानले.
