नितीन शिंदे, मुंबई महानगर प्रतिनिधी
9892250402
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन ठाणे:- पोलीस भरतीसाठी गावाहून मुंबईत आलेल्या तरुणींवर आली दादर स्टेशनवर राहण्याची वेळ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या प्रसंगाची माहिती कळताच सूत्र तत्काळ हलली आणि या सर्व मुलींच्या सुरक्षेसाठी तात्काळ व्यवस्था करण्यात आली.
नाशिक जिल्ह्यातून सहा मुली मुंबईत नायगाव येथे पोलीस भरती परीक्षेला आल्या होत्या. मात्र दुर्दैवाने पोलीस भरती प्रक्रिया सुरू असलेल्या ठिकाणी म्हणजेच नायगाव येथे त्यांच्या राहण्याची जागा अचानक नाकारण्यात आली. जागा तुडुंब भरली असल्याने तेथून त्यांना सकाळपर्यंत परतवण्यात आले. पण कुठे राहायचे हे त्यांना सांगितले जात नव्हते. या बिचार्या सहा मुली तेथे खूप वेळ वाट बघत होत्या पण त्यांना कोणतीच मदत मिळाली नाही.
सायंकाळच्या वेळेस नायगाव पोलीस भरती ग्राउंडवर त्यांची राहण्याची सोय नाकारण्यात आली, त्यानंतर कोणीतरी त्यांच्याकडून गेस्ट रूम मध्ये राहण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली, इतके पैसे नसल्याने या मुली पुन्हा एकत्र दादर स्टेशन परिसरात आल्या. तेथे बसल्या व आजची रात्र कुठे घालवायची या विचाराने चिंतित झाल्या. त्या दादर प्लॅटफॉर्म बाहेर असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलला विचारलं असता त्यांनीही चौकशी केली पण त्यांना प्लॅटफॉर्मवर असलेल्या विश्रामगृहात फक्त दोन तासांसाठी राहता येईल असे सांगण्यात आले.
त्याच वेळेस तेथून जाणाऱ्या एका महिला पत्रकार अस्मिता यांनी हा प्रकार पाहिला. या मुलींची विचारपूस केली असता हा सर्व प्रकार त्यांना समजला, त्यांनी तातडीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन केला मात्र त्यांचा फोन व्यस्त असल्याने थेट वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी फोन करण्यात आला. तेथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सचिव अमित बराटे हे होते, त्यांनी हे सगळं ऐकताच ताबडतोब स्टेशन मास्तर अमित खरे व डेप्युटी स्टेशन मास्तर पाण्डेय यांच्याशी फोनवर संवाद साधत या सहा मुलींना रात्री सुखरूप राहण्यासाठी व विश्रांतीसाठी महिला वेटिंग रूम मध्ये तात्काळ व्यवस्था करण्यास सांगितले.
या सहा मुलींना सुरक्षेचं कवच म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांचे सचिव अमित बराटे कर्तव्यात खरे उतरले. या सहा मुली व त्यांचे आई वडील हे ऐकून निर्धास्त झाले व त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सचिव अमित बराटे व रेल्वे स्टाफ यांचे मनःपूर्वक आभार मानले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे धन्यवाद मानावे तेवढे कमीच आहेत असे या मुलींनी व त्यांच्या कुटुंबीयांनी म्हटले आहे.

