उषा कांबळे सांगली शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन सांगली:- संजयनगर येथील रुक्मिणी हाऊसिंग सोसायटी तर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉ. जयश्री पाटील या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपाच्या प्रदेशसदस्या नीताताई केळकर होत्या. यावेळी माजी महापौर कांचन कांबळे, मालन शिरगुपीकर, डाँ. मेघा गायकवाड, खेळाडू काजल सरगर, मुकेश कोलप, संजय कांबळे, डाँ .मोनिका कल्लूळे, विजया चव्हाण, प्राजक्ता वाघमारे,आनंद हाबळे, डॉ. मनीषा जमणे आदी महिला उपस्थित होत्या.
महिलांनी स्वतःचे गुण, कला ओळखायला शिका कारण जग जरी पुढे गेले तरी स्त्रियांना दुय्यम लेखले तरी सुद्धा जोपर्यंत स्त्री आहे तोपर्यंत समाज आहे असे प्रतिपादन सांगलीतील संजयनगर येथे रुक्मिणी हाऊसिंग सोसायटी तर्फे आयोजित करण्यात आलेल्या महिलादिन कार्यक्रमांत डॉ. जयश्री पाटील बोलत होत्या. या कार्यक्रमाचे संयोजन रुक्मिणी हाऊसिंग सोसायटीच्या अध्यक्ष उषाताई कांबळे आणि सर्व संचालक मंडळाने केले होते.

पुढे बोलताना जयश्री पाटील म्हणाल्या की स्त्री म्हणजे सन्मानाची कास, स्त्री भ्रूणहत्या म्हणजे साऱ्या जगाचा ऱ्हास असे प्रतिपादन जयश्री पाटील यांनी बोलताना केले.
यावेळी अनेक महिलांनी आपले विचार मांडले. काही महिलांनी कविता सादर करून उपस्थित महिलांचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात शेकडो महिलांनी सहभागी होऊन हा कार्यक्रम यशस्वी केला.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

