मंगेश जगताप, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:- च्या बोरिवली येथून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. बोरिवली येथे एक चार मजली इमारत कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली आहे. या संपूर्ण इमारती मध्ये जवळपास 15 ते 16 परिवार राहत असल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेनंतर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.
बोरिवली पश्चिम परिसरात असलेल्या साईबाबा नगरातील गीतांजली इमारत दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळली. दुर्घटनेची तीव्रता बघता त्यात मोठ्या प्रमाणात वित हानी झाल्याचेही समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. अग्निशमन दलाच्या जवानांनी स्थानिक नागरिकांच्या मदतीने घटनास्थळी बचावकार्य सुरू केले आहे. पोलीस, बीएमसीचे पथक देखील घटनास्थळी दाखल झाले आहे.
साईबाबा नगरातील परिसरातील गीतांजली इमारत ही 30 ते 35 वर्षे जुनी होती. ही इमारत धोकादायक असल्याचं मनपाकडून जाहीर करण्यात आलं होतं. त्यानुसार नागरिकांनी सकाळीच आपले घर खाली केले होते. त्यामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. ढिगाऱ्याखाली काहीही नसल्याचे मुंबई पालिका प्रशासनाने सांगितले आहे.