राज शिर्के, मुंबई पवई प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- पासून जवळ असलेल्या शहापूर येथून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. एका युवकाचा जिलेटीन कांड्याच्या झालेल्या स्फोटात दुर्दैवी मृत्यू झाला. हा जिलेटीन कांड्याच्या स्फोट इतका भीषण होता की, त्या युवकाचा मृतदेहाचे 25 फुटांच्या अंतरावर तुकडे-तुकडे पडले होते. त्यामुळे घातपात की अपघात? याबाबत विविध चर्चेला उधाण आले आहे. याबद्दल पोलीस तपास करत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहापूर इथं मुंबई नाशिक महामार्गावरील कोशींबी जवळील शेतात ही घटना घडली. कल्पेश देसले वय 32 वर्ष असे मृतक युवकाचे नाव आहे. कल्पेश देसले हा वासिंद जवळील दहागाव इथं राहत होता. मंगळवारी रात्री 10 वाजेच्या सुमारास कल्पेश हा हळदीच्या कार्यक्रमाला जातो असं सांगून घरातून गेला होता. पण, सकाळपर्यंत तो घरी आलाच नाही. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता कुठेही आढळून आला नाही. काही वेळानंतर मुंबई नाशिक महामार्गावरील कोशींबी जवळील शेतातील एका पत्रा शेडच्या बाहेर कल्पेश देसलेचा छिन्न विच्छिन्न अवस्थेत मृतदेह आढळून आला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झाले. स्फोट तपास यंत्रणा, श्वान पथक, एटीएस, गुन्हे अन्वेषण विभाग अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाचा पाहणी केली असता जिलेटीनच्या कांड्याच्या स्फोटात कल्पेशचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. पण घटनास्थळी क्लेशचा मृतदेह आढळून आला तो शेडच्या बाजूला होता. त्यामुळे नेमकं काय घडलं, हा अपघात होता घातपात होता, याचा संशय पोलिसांना बळावला आहे.
या घटनेची माहिती होतात पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून कल्पेशच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतील येथील जे जे रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कल्पेशचा मृत्यू हा अपघातात नसून घातपात असल्याचा नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहे. घटनेचा पुढील तपास क्राईम ब्रँच, बॉम्ब शोधक पथक आणि पडदा पोलीस करत आहेत.