✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात मागील काही दिवसापासून अपघाताचे सत्र सुरू आहे. यामुळे अनेक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेक नागरिक गंभीर जखमी झाले आहे. त्यामुळे हिंगणघाट शहरातील नागरिकात प्रशासना विरोधात मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे शहरात घडत असलेल्या अपघाताच्या या घटना बघता राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदीले यांचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदनातून इशारा शहरातील संविधान चौक ते सरकारी दवाखाना चौक येथील राष्ट्रीय महामार्गावर कायमस्वरूपी बॅरिकेटींगची मागणी केली आहे.
सात दिवसात मागण्या पूर्ण न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रीय महामार्गावर करणार चक्का जाम आंदोलन अपघात टाळण्याच्या दृष्टिकोनातून कुठलीही ठोस उपाययोजना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केली गेली नसल्याने होतात अपघात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून नंदोरी चौकाचा उडान पूल समताच संविधान चौकातून (कलोडे चौक) ते उपजिल्हा रुग्णालयासमोरील रेल्वेच्या उडानपुरापर्यंत लोखंडी कायम स्वरूपाची बॅरी केटिंग करत या दोन्ही चौकातून होणारी वाहतूक नंदोरी चौकातील उडानपुला खालून व रेल्वेच्या उडानपुला खालून वळविल्यास बसणार अपघातांना आळा. यावेळी निवेदनाच्या आव्हाना सोबत उपाययोजना देखील सुचविल्या.
★★★★★★★★★★★★★★★★★★★
आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348