✒️प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
मोबा. न. 9284981757
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:– जिल्ह्यात होणारे प्रस्तावित मेडिकल कॉलेज हे हिंगणघाट शहरात व्हावे ही मागणी जोर धरत आहे. यासाठी सर्व स्तरातून आंदोलन होत आहे. यात हिंगणघाट विधानसभा काँग्रेसचे प्रभारी प्रवीण उपासे यांनी राज्याचे मुख्यमंत्री यांना आज मंगळवार दि ९ मेला तहसीलदार, हिंगणघाट यांचे मार्फत निवेदन सादर केले.
श्री उपासे यांनी सदर निवेदनातून हिंगणघाट येथील उपजिल्हा रुग्णालयात मेडिकल कॉलेज करिता आवश्यक असलेला भूखंड उपलब्ध असल्याची माहिती दिली. तसेच हिंगणघाट येथे शासकीय जिल्हा रुग्णालय मंजूर करण्यासाठी सबळ कारणे आहेत. उपजिल्हा रुग्णालय हिंगणघाट हे वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर व नागपूर या चार जिल्ह्याचे सीमेवर आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील रूग्णना या रुग्णालयाचा लाभ घेता येईल. या रुग्णालयापासून 45 की मी पर्यंत कुठेही जिल्हा रुग्णालय नसल्याने या उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे आवश्यक आहे. नगर परिषद हिंगणघाट क्षेत्रात जोडून असलेली गावातील जवळपास 70 ते 80 हजार लोकसंख्या या रुग्णालयाच्या आरोग्य सेवेवर अवलंबून आहे. वरोरा व चिमूर तालुका लोकसंख्या वणी आणि उमरेड अशी एकूण जवळपास 3 लाख लोकसंख्या या रुग्णालयाचा लाभ घेऊ शकते. हिंगणघाट शहरात रेल्वे जंक्शन, एक राष्ट्रीय महामार्ग तसेच आजूबाजूला असलेले औधोगिक्षेत्र, टेक्स्टाईल्स, मिल, जीन इत्यादी इंडस्ट्रीज मधील संभाव्य अपघात संख्या व बरीच कामगार संख्या लक्षात घेता या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्याची आवश्यकता आहे. या उपजिल्हा रुग्णालयात 100 खाटाची सुविधा असतांना सुद्धा वर्षाला दीड लाखाचे वर बाह्यरुग्णसंख्या 79 टक्केच्या वर बेड अक्यूपंशी रेट, 650 चे वर प्रसूती, 582 मोठ्या शस्त्रक्रिया, 645 छोट्या शस्त्रक्रिया, वाढत्या एम एल सी केसेस पोष्टमार्टेम, इत्यादी महत्वाच्या बाबी लक्षात घेता उपलब्ध मनुष्यबळ कमी पडत असल्याने रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करणे अत्यन्त आवश्यक आहे.
या परिसरात नेहमी होणाऱ्या अपघातांची संख्या आणि सभोवताल असलेली लोकसंख्येच्या आरोग्याची समस्या लक्षात घेता व वैद्यकीय समस्या पहाता येथे विशेष उपचारांनीयुक्त अशा मेडिकल कॉलेजची हिंगणघाट शहरात अत्यन्त गरज असल्याची मागनी या निवेदनातून करण्यात आली या मागणीची त्वरित दखल न घेतल्यास शासनाविरुद्ध तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवीण उपासे यांनी दिला आहे.
निवेदन देतेवेळी नरेंद्र चाफले, ज्वलंत मून, गुणवंत कारवाटकर, सुरेंद्र बोरकर, प्रतीक जामगडे, पवन कटारे, प्रवीण भाईमरे, हेमंत पोटदुखे, अविनाश चंदनखेडे, सिद्धार्थ म्हस्के, प्रज्वल दुरबडे इत्यादी उपस्थिती होते.