देवेंद्र सिरसाट, हिंगणा(नागपुर)तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- मागच्या हप्त्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तसेच गारपीट व वादळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते, त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला होता त्यामुळे शेतकऱ्यांच्या काय अडचणी आहेत हे जाणून घेण्यासाठी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष अनिल मेश्राम यांनी हिंगणा तालुक्यातील कान्होलीबारा या गावाला भेट दिली, तेथील शेतकऱ्यांचे प्रश्न व त्यांचे अडीअडचणी पक्षाच्या माध्यमातून शासनापर्यंत पाठविल्या जातील असे अनिल मेश्राम यांनी शेतकऱ्यांना घेतलेल्या बैठकीत आश्वासन दिले,
यावेळी बैठक घेण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी रविचंद्र गव्हाळे होते, तर उपस्थितांमध्ये तुकाराम शेलघरे, गोविंदराव कुकडकर, मुकेश रेवतकर, महिंद्रा भोयर, कडूजी पिंपळे, कृष्णाजी गव्हाळे, गज्जू बुधबावरे, हनुमान ढोढरे, राजू आत्राम, इत्यादी उपस्थित होते.