✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी मो. न. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- श्री स्वराज्य युवा प्रतिष्ठान हिंगणघाट व्दारा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० वा राज्यभिषेक सोहळ्या निमित्ताने हिंगणघाट येथील शिवाजी पार्क येथे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून अटलबिहारी पांडे वि.हि.प. व अभय दांडेकर रेनबो वक्ता अकॅडमी हिंगणघाट उपस्थित राहुन छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास तरुणांसमोर मांडला.
यावेळी या कार्यक्रमाला उपस्थित प्रेम बंसतानी माजी नगराध्यक्ष, माजी नगरसेविका शुभांगी डोंगरे, सुनील डोगरे, आशिष पर्बत, दिनेश वर्मा, गौरव तांबोळी, रोहित राऊत, मुस्तफा बक्ष, अजय बारसागडे, केतन भुडे, लखन नागापुरे, आर्या पाचखेडे, गौरव मोहर्ले, साहिल काळे, हर्ष मुन, वैष्णवी पिसे व सर्व उपस्थित होते.

