नितेश पत्रकार, यवतमाळ उपजिल्हा प्रतिनिधी
मो. नं. 7620029220
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन झरी जामणी:- यवतमाळ जिल्ह्यातील झरि जामणी तालुक्यामध्ये येणाऱ्या गावाचा मुख्यालयाशी संपर्क तुटला आहे. तर गाडेघाट येथे शेतकऱ्याच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात भरून पाणी बाहेर वाहत आहे त्यामुळे हातात येणारे पीक पूर्णपणे पाण्यामध्ये डूबले आहे. शासनाने याची दखल घेऊन तत्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
शेती उपयोगी साहित्य आणण्यासाठी मुकुटबन बाजार पेठेत जावे लागते परंतु पाणी खूप असल्याने ते पण त्यांचे येणे जाणे बंद झाले आहे . शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींचे शिक्षण पाण्या मद्ये च बुडत आहे. दोन दिवपासून पाणी असल्यामुळे घराच्या बाहेर येणे जाणे सुद्धा बंद झाले. जर एकदा रुग्णाला रुग्णालयात नायच म्हंटले तर खूप कठीण झाले आहे. एकदा गंभीर रुग्णाला न्यायचा म्हंटला तर तो घरीच मरणार परंतु त्याला कुण्या हॉस्पिटल मध्ये घेऊन पण जाऊ शकत नाही कारण तर मांगली धानोरा कडून पण त्यांचा संपर्क तुटला आहे.
मांगली वरून गाडेघाट 2 किमी चा अंतर धानोरा वरून 3 किमी चा अंतर आहे. धानोरा कडून जायचे म्हंटले तर शेत आहे पायदळ जाण्या शिवाय पर्याय नाही. दोन दिवसापासून गाडी सुद्धा घरीच आहे ते पण बाहेर जाउ शकत नाही. याकडे प्रशासनाने लक्ष्य देऊन तत्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 976644534/7385445348

