निखिल पिदूरकर, कोरपणा तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन कोरपणा:- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त केंद्र व राज्य शासनाने गेले वर्षभर विविध कार्यक्रम हाती घेतले. अमृत महोत्सवी वर्षाच्या समारोपानिमित्त केंद्र शासनाच्या सुचनेनुसार, यावर्षी देशभर 9 ते 15 ऑगस्ट दरम्यान ‘मेरी मिट्टी मेरा देश’ हा उपक्रम ग्रामपंचायत स्तरावर राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत ‘मातीस नमन, वीरांस वंदन’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. याचे औचित्य साधून राजेंद्र विद्यालय भोयगाव येथे विविध उपक्रम राबविले जात आहे.
दि. 11ऑगस्टला राजेंद्र विद्यालय भोयगाव येथे मेरी मिट्टी मेरा देश या अभियाना अन्तर्गत कु. एस. एन. गाडगे यानी निबंध स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये 16 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. तसेच वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आली. यामध्ये दोन्ही गट् मिळून 12 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. या वक्तृत्व स्पर्धेचे परिक्षक म्हणून् श्री. बी. झेड. निखाडे व व्ही. टी. वैद्य यांनी काम केले. सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन श्री. जी. एम. लांडे यांनी केले. तसेच दि. 12 ऑगस्टला चित्रकला व घोष वाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली. प्रत्येक स्पर्धे मधून दोनही गटा मधून दोन उत्कृष्ट स्पर्धकाची निवड करण्यात आली.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

