पल्लवी मेश्राम, नागपुर शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपूर:- येथून एक मन हेलवणारी दुर्दैवी घटना समोर आली आहे. एक महिला आपल्या बहीण आणि बाळासह देवदर्शनासाठी दुचाकीने जात असताना ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला या अपघातात ट्रकने 14 महिन्याच्या बाळाला चिरडले त्यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यात दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहे.
दुकाचीने देवदर्शन करण्यासाठी दोन महिला व त्याच 14 महिन्याचे बाळासह जात होते. यावेळी ट्रकने भीषण अपघात झाला. बाळ चिरडल्या गेला आणि या दोन्ही महिला गंभीर जखमी झाल्या त्यांच्यावर एम्स रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अथर्व असे मृत बाळाचे नाव आहे तर आई संध्या आशीष बारमाटे वय 25 वर्ष रा. घाटरोहणा, गोंडेगाव- पारशिवनी आणि दीपाली प्रकाश पाटील वय 24 वर्ष, रा. खापरी रेल्वे कॉर्टर, खापरी अशी गंभीर जखमी महिलांची नावे आहेत.
संध्या बारमाटे यांचे गेल्या दोन वर्षांपूर्वीच लग्न झाले होते. तिला 14 महिन्यांच्या बाळासह टाकळघाटला देवदर्शनाला जायचे होते. संध्याची विवाहित बहीण दीपाली पाटील ही खापरीमध्ये राहते. त्यामुळे संध्या ही पती आशीष व मुलगा अथर्वसह दुचाकीने दीपालीच्या घरी गेले. शनिवारी सायंकाळी टाकळघाटला जाण्यासाठी संध्या ही बहीण आणि बाळासह दुचाकीने जात होत्या, तर आशीष बारमाटे आणि प्रकाश पाटील हे बसने टाकळघाटला गेले. जामठ्यापासून जात असताना मागून भरधाव आलेल्या ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात बाळाचा मृत्यू झाला तर संध्या आणि दीपाली गंभीर जखमी झाल्या. अपघात होताच ट्रकचालकाने पळ काढला. काही वेळात हिंगणा पोलीस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी आरोपी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

