हनिशा दुधे, चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर:- शहरात दिवसा गणित क्राईम ग्राफ मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येते आहे. अशीच एक खळबळजनक घटना घडली आहे. बल्लारपूर शहरातील शिवनगर वॉर्डात असलेल्या आयडीएल शाळेतून पावसात छत्री घेऊन जात असलेल्या महिलेवर मोटरसायकल वरून आलेल्या दोन तरुणांनी महिलेच्या गळ्यातील सुमारे ५० ग्रॅम वजनाची सोनसाखळी हिसकावून पलायन केले.
या विरोधात या महिलेने बल्लारपूर पोलीस स्टेशन मध्ये अज्ञात चोरट्यांनी विरोधात तक्रार दाखल केली. रोजा सुरेश बनोत, रा. फुलसिंग नाईक वार्ड, यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी धडक कारवाई करत दोन्ही चोरट्यांना अटक केली. ही घटना 11 वाजता घडली असल्याचे सांगण्यात येत आहे.
14 सप्टेंबर रोजी रस्त्याने जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी दोन मोटर सायकल वरून आलेल्या चोरट्यांनी 5 ग्रॅम सोन्याची चेन हिसकावून नेली, ज्याची किंमत सुमारे 20 हजार रुपये आहे. बल्लारपूर पोलीसानी हे प्रकरण तपासात घेऊन चौकशी सुरू केली. त्यात सूरज उर्फ पच्छिस मधुकर इंद्रपवार वय 25 वर्ष रा. विवेकानंद वार्ड व रणजित बालकदास लोखंडे वय 30 वर्ष रा.पंडित दीनदयाळ बल्लारपूर यांना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतल्या नंतर त्यांची चौकशी सुरू आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांच्या सक्षम मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे व त्यांच्या पोलीस पथकाने केली.

