राज शिर्के, मुंबई शहर प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मुंबई:- भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य कलं आहे. त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर आता राज्यभरात राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाच्या वतीने संताप व्यक्त केला जात आहे.
काही ठिकाणी गोपीचंद पडळकर यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून त्यांच्या व्यक्तव्याचा निषेध करण्यात येत आहे. तसेच पडळकर दिसतील तिथे त्यांना चोप देऊ अशाही संतप्त प्रतिक्रिया राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून देण्यात येत आहेत.
काय आहे प्रकरण?
धरनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. गोपीचंद पडळकर म्हणाले की, “धनगर समाजाबद्दल अजित पवार यांची भावना स्वच्छ नाही. म्हणून धनगर आरक्षणाबाबत अजित पवार यांना पत्र देण्याची गरज नाही. अजित पवार लबाड लांडग्याचं लबाड पिल्लू आहेत. अजित पवारांना आम्ही मानत नाही आणि कधी पत्रही दिलं नाही. पुढेही देण्याची आवश्यकता वाटत नाही. त्यामुळे ज्यांच्याकडून आम्हाला न्याय मिळू शकतो, अशा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलं आहे,” असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.

