मुकेश चौधरी कार्यकारी संपादक महाराष्ट्र
संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- वाढती स्पर्धा, अपयशातून येणारे नैराश्य आणि ताण पडत तणावातुन समाजात घडणाऱ्या नकारात्मक घटनांंचा सामना करण्यासाठी शालेय शिक्षण सोबत विद्यार्थांना शारीरिक मानसिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी योगाभ्यास महत्वाचा असल्याचे प्रतिपादन वर्धा जिल्हा भारत स्वाभिमान चे प्रभारी वसंत पाल यांनी केले. ते शहरातील भारत विद्यालयात सकाळ चे वतीने आयोजित ‘ स्वास्थ्यम ‘ कार्यक्रमात बोलताना म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, योगा अभ्यासातुन शारीरिक, मानसिक सक्षमता मिळत असल्याने विद्यार्थांनी योगाभ्यास अंगिकारने गरजेचं आहे. सकाळ ‘ स्वास्थम’ कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी भारत विद्यालयाचे मुख्याध्यापक राजु कारवटकर होते. या कार्यक्रमात वर्धा जिल्हा भारत स्वाभिमान प्रभारी वसंत पाल, पतंजली योग समिती कोअर कमेटी सदस्य राजा महाराज शेंडे, पतंजली योग समिती चे हिंगणघाट तालुका प्रभारी योगेश सुंकटवार यांनी विद्यार्थांंकडून योगाभ्यासाचे प्रात्यक्षिक करून दाखवले.
आ कार्यक्रमाचे संचालन मिलिंद सावरकर यांनी केले. यावेळी वर्धा जिल्हा सकाळचे सहाय्यक व्यवस्थापक वितरण प्रमोद चंदेल, हिंगणघाट तालुका बातमीदार मंगेश वणीकर, नंदोरी चे बातमीदार पतंजली योग समिती वर्धा जिल्हा सोशल मीडिया प्रभारी प्रभाकर कोळसे, हिंगणघाट तालुका पतंजली किसान समिती प्रभारी प्रा. सुरेश दविले, भारत विद्यालयाचे उप मुख्याध्यापक भट्टड, पर्यवेक्षक नांदुरकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी तथा शिक्षक उपस्थित होते.