✒️ राज शिर्के, मुंबई प्रतिनिधी
मुंबई:- सध्या मुंबईत दसरा मेळाव्याच राजकारण चांगल तापल आहे. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान कोण मारणार?; अजित पवार म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं…” मागील काही दिवसांपासून शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कोण घेणार यावरून वाद सुरु आहे. त्यावरती अजित पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केला आहे.
दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्कचं मैदान कोण मारणार?; अजित पवार म्हणाले, “बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलेलं…” शिवाजी पार्कमध्ये यंदा शिवसेनेचा की शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार, यावरून राजकारण तापलं आहे. शिवाजी पार्कमध्ये दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवसेनेनं पालिकेत अर्ज दाखल केला आहे. त्यापाठोपाठ शिंदे गटानेही अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे मैदान कोण मारणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. त्यावर आता राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“शिवसेना आणि शिंदे गटाने त्यांच्या परिने मेळावे घ्यावेत. मेळावा घेण्याचा मान बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या मैदानात सांगितलं होत की, यापुढे शिवसेनेचं नेतृत्व उद्धव ठाकरे करतील. शिवसैनिक त्याच गोष्टीला प्रतिसाद देतील,” असे अजित पवार यांनी म्हटलं.

