मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- पत्रकार संघ व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्त पत्रकार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
हिंगणघाट शहरात पत्रकार दिनाचे औचित्य साधून बस स्टॉप परिसरासत असलेल्या कॉम्प्लेक्स मध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ॲड. श्रावण ढगे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंगणघाट शासकीय उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल रुईकर, हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मूळूक, पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हाजी मोहम्मद रफीक हे व्यासपीठावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पत्रकारितेचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दिप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदीप नागपुरकर यांनी केले. त्यांनी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवन परिचय आणि मराठी पत्रकारिता कशी सुरुवात झाली असा पत्रकारितेचा इतिहास सविस्तर सांगितला. यावेळी महाराष्ट्र संदेश न्युजचे संपादक प्रशांत जगताप यांनी आजची पत्रकारिता आणि व्यवसायिक पत्रकारिता सत्य आणि असत्याची बाजू पिडीत गरीब न्याय हक्क अधिकार मिळावी यासाठी लढणारी पत्रकारिता असली पाहिजे अशी भूमिका मांडली.
त्यानंतर हिंगणघाट पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मारुती मुळक यांनी सर्वांना पत्रकार दिनाच्या शुभेच्या देत, पत्रकारांनी सत्याची धार बनून गोर गरीब जनतेला न्याय देण्याचे कार्य निरतर सुरू करून आपली सामाजिक जबाबदारी योग्य प्रमाणे पार पाडावी. यानंतर जेष्ठ विविज्ञ ॲड. श्रावण ढगे यांनी पत्रकारीता एक लोकशाही टिकवण्यासाठी एक महत्वपूर्ण व्यवस्था आहे. आपण पत्रकार म्हणून जिद्दीने काम करणाऱ्या पत्रकाराना शुभेच्छा दिला. पत्रकारासाठी असलेल्या 19 (1) A या कायद्याची सखोल माहिती दिली.
यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हाजी मोहम्मद रफीक पत्रकार आणि हिंगणघाट उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.विशाल रुईकर यांचा हिंगणघाट पत्रकार संघाच्या वतीने शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष हाजी मोहम्मद रफीक यांनी सर्व पत्रकारांना शुभेच्छा देत पत्रकाराचे अनेक प्रश्न आज समाजात निर्माण झाले असून ते सोडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे सूत्र संचालन सोनू आर्य यांनी केले तर आभार रवी येनोरकर यांनी मानले. यावेळी मंगेश वणीकर, विजय राठी, मुकेश चौधरी, रमेश लोंढे, दशरथ ढोकपांडे, रवी येनुरकर, प्रदीप नागपुरकर, प्रमोद जुमडे, राजेश कोचर, अनिल कडू, केवलदास ढाले, जगदीश प्रसाद शुक्ला, नईम मलक, सोनू आर्या, अब्बास खान, सुरेंद्र बोरकर, रसपाल शेंद्रे, सय्यद जाकिर, माजी नगरसेवक प्यारू कुरुशी, जी. सी.खिची यांचेसह हिंगणघाट शहरातील अनेक पत्रकार उपस्थित होते.