प्रविण जगताप, वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- शहरात मोकाट जनावरानी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. सायंकाळच्या सुमारास ही मोकाट जनावरांना रस्त्यावर येऊन ठीया मांडत असल्याने अपघाताचे कारण ठरतात जनावरांचा मालकानवरती नगर पालिका प्रशासन कधी काळी थाठुरमाथूर कारवाई करून गप्प बसत आहे. त्यामुळे एखादी मोठा अपघात होण्याची वाट प्रशासन बघत आहे की काय अशा प्रश्न आज नागरिकांना पडला आहे.
वर्धा जिल्हात रस्तावर मोकाट जनावरांमुळे वाढते अपघात चिंतेची बाब ठरत आहे. त्या अनुषंगाने केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी वाहतूक नियम कठोर केलेत. पण अपघात थांबता थांबेना. अपघात होण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे रस्त्यावर मोकाट जनावरांची वाढती वर्दळ हे पण असल्याचे सांगितले जाते. रात्री मोकाट पशुचे रस्त्यावर फिरणे वाहनचालकांना गोंधळात टाकते. आणि अपघात घडतात, असे परिवहन खाते आकडेवारी देत स्पष्ट करते.
आता हेच खाते उपाय घेऊन पुढे आले आहे. अश्या पशुमुळे वाहनचालकांचे होणारे अपघात लक्षात घेऊन उपप्रादेशिक परिवहन विभागाने एक अॅप विकसित केले आहे. त्या आधारे मोकाट पशुना जिओ टॅगिंग केले जाते. महामार्ग परिसरातील गावात असलेल्या पशुना असे रिफ्लेक्टिव बेल्ट लावले जातात. हे गळ्यातील पट्टे दुरवरून चमकतात. त्यामुळे वाहचालक सतर्क होत असल्याने अपघात टळतात. कमी प्रकाशाच्या परिस्थितीत किंवा रात्रीच्या वेळी अपघाताच्या घटना निश्चित कमी होतील, असा दावा आरटीओ विभागाने केला आहे. जनावरांचे रस्त्यावर येणे पूर्णपणे थांबविणे शक्य नसले तरी हे पट्टे लागल्यास अपघात कमी होतील.