हनिशा दुधे चंद्रपूर जिल्हा ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन बल्लारपूर दि.१३ मार्च:- रोजी वंचित बहुजन पुरुष आघाडी, महिला आघाडी तसेच युवा आघाडीच्या वतीने महाराष्ट्र जीवन प्राधिकणाच्या मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये बल्लारपूर शहरामध्ये सर्वत्र योग्य दाबाचा नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा तसेच २४ तास पाणी पुरवठा करणे शक्य नसल्यास प्रत्येक नळ धारकांना समान सरासरी बिल आकारण्यात यावे. या मागण्या १५ दिवसाच्या आत पूर्ण न झाल्यास वंचित बहुजन आघाडी आंदोलनाचा इशारा देत आहे .
यामध्ये प्रामुख्याने वंचित बहुजन महिला आघाडी तालुका अध्यक्ष नम्रता साव, शहर अध्यक्ष रेखा पागडे, प्रज्ञा नमंकर, नंदा देशभ्रतार, जया भंडारे, अनिता निरांजने, रंजना गायकवाड, वंचित बहुजन पुरुष आघाडी कार्याध्यक्ष उमेश जनार्दन कडू, ज्येष्ठ सल्लागार दुरेश तेलंग, शहर संघटक पराग जांभूळकर, राकेश पेटकर, सुधाकर गेडाम, डी वाय नंदेश्र्वर, बटघरे सर तसेच वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रियंकेश शिंगाडे, सुबोध मानकर व वंचित चे सर्व कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला.