रविंद्र भदर्गे, जालना जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन परतूर:- तालुक्यात रस्त्यात खड्डेच खड्डे असल्यामुळे सध्या पावसाळा लागल्यामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे व कादरी हॉस्पिटल पासून ते इंदिरा नगर आंबा रोड पर्यंत विद्यार्थ्यांना करावी लागते कसरत कादरी हॉस्पिटल च्या जवळील रोडच्या मधोमध एक मोठा खड्डा आहे त्यात पाणी खूप साचलेले आहे आणि खड्ड्याच्या बाजूला विद्युत तारेच्या खांबावर डीपी आहे आणि जवळच खड्ड्यातल्या पाण्यात करंड उतरण्याची शक्यता दाट असल्या कारणाने आंबा ते परतूर शाळेत जाण्यासाठी विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका होऊ शकतो व जीवित हानी होऊ शकते विद्यार्थी सायकल व ऑटो रिक्षा स्कूल बस ने प्रवास करतात या असल्या खड्ड्याच्या रस्त्याकडे नगर परिषदेतील मुख्याधिकाऱ्याचे लक्ष नाही आणि खड्ड्यात साचलेल्या पाण्यात करंड उतरु शकतो तर ना विद्युत महामंडळतील अधिकाऱ्यांचे लक्ष ना आमदार ना माजी आमदार यांचे लक्ष त्यामूळे नागरिकांच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. की आमच्या मुलांना एकट्यांना शाळेत जाण्यासाठी सोडले तर कुठ्ल्याही प्रकारची घटना घडु शकते त्यामुळे परतूर शहरातील नागरिक मुलांना शाळेत घेऊन जाणे आणि शाळा सुटल्यावर घरी घेऊन येणे करत आहेत. त्यामुळे नागरिकांची मागणी आहे की लावकरात लवकर रस्ता करुन द्यावा किंवा खड्ड्यात साचलेल्या पाण्याची सोय करण्यात यावी व याकडे प्रशासन लक्ष देत की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे