अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- नागपूर व अमरावती विभागातील निवासी जमिनी फ्रि-होल्ड (भागवदार वर्ग-1) करण्यासाठी विशेष अभय योजना राबविण्यांत येत आहे. या योजने अंतर्गत 31 जुलै 2025 पर्यंत निवासी प्रयोजनार्थ भाडे तत्वावर दिलेल्या नझुल जमिनी फ्रि-होल्ड करण्याकरीता महिन्याच्या दर बुधवारी (शासकीय सुटीचे दिवस वगळून) सकाळी 11 ते दुपारी 4.00 वाजे पावेतो शिबिरा चे आयोजन करण्यात आले आहे. शिबिरा मध्ये नागरिकांनी अर्ज दाखल करुन विशेष अभय योजनेचा लाभ घ्यावा.
तसेच नागपूर व अमरावती विभागातील नझुल जमीनीच्या भाडेपट्यांची नुतनीकरणा विषयी तसेच त्या संदर्भातील शंर्तभंग, वापरात बदल, विनापरवानगी हस्तांतरण इत्यादी विषया बाबत शा.नि.दि.23.12.2015 अन्वये सुधारीत धोरण निश्चित करण्यांत आले आहे. सदर निर्णयान्वये नझुल भाडेपट्याचे हस्तांतरण, वापरात बदल, शर्तभंग निर्यामतीकरणासाठी विहित अनर्जित रक्कमेचे दर जास्त असल्याने ते दर कमी करण्या बाबत शासनाकडे विविध घटकांकडून केलेल्या मागणीचा विचार करुन 23 डिसेंबर 2015 च्या शासन निर्णयात सुधारणा करुन 02 मार्च 2019 रोजी सुधारीत शासन निर्णय नागपूर व अमरावती विभागातील लिलावाव्दारे किंवा अन्य प्रकारे भाडेतत्वावर दिलेल्या जमिनी फ्रि-होल्ड करण्याबाबतचा देखील निर्णय घेण्यात आलेला आहे.
विशेष अभय योजना ही 31 जुलै 2025 पर्यंतच राबविण्यांत येणार असून, त्यानंतर डिसेंबर 2015 व 02 मार्च 2019 च्या शासन निर्णयानुसार कार्यवाही सुरु राहणार आहे. अशी माहिती वंदना सवरंगपते उपविभागीय अधिकारी तथा नझुल अधिकारी, हिंगणघाट यांनी दिली.

