अनिल कडू हिंगणघाट विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन हिंगणघाट:- ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो. याच औचित्याने भारत विद्यालय, हिंगणघाट येथे दि. ०३ जानेवारी हा दिवस क्रांती ज्योती सावित्री बाई फ़ुले जयंती “महिला मुक्ती दिन व बालिका दिवस” म्हणून साजरा केला गेला.
यावेळी मुख्याध्यापक राजु कारवटकर व उपमुख्याध्यापक हरीश भट्टड यानी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सोहळ्याची सुरुवात केली. याप्रसंगी पर्यवेक्षिका निलांक्षी बुरिले, पर्यवेक्षक विनोदजी नांदुरकर, उच्च माध्यमिक विभागाच्या शिक्षिका राजश्री तांबोळी, माध्यमिक विभागाच्या वंदना वरघने यांची प्रमुख उपस्थिती होती. क्रांतीज्योती सावित्रीबाईंच्या जीवन दर्शन वर संपूर्ण ऐतिहासिक माहिती राजश्री तांबोळी यांनी विद्यार्थ्यांना दिली. वंदना वरघने यांनी सर्व विद्यार्थ्यांना सावित्रीबाईं बद्दल व त्यांच्या जिवन कार्याबद्दल माहिती देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. निलाक्षी बुरीले व विनोद नांदुरकर यांनी सावित्रीबाईंच्या जीवनावरील विविध प्रसंग सर्व विद्यार्थ्यांसमोर मांडत सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.
यावेळी शाळेतील विद्यार्थिनींनी देखील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रयत्नाने स्त्री शिक्षणाचे महत्त्व, आजच्या काळातील स्त्रियांची स्थिती, तात्कालीन परिस्थिती, शिक्षण काळाची गरज या सर्व विषयावर आपल्या मनोगत पर भाषणातून प्रकाश टाकला. आणि विद्यार्थिनींनी समूह गीत सादर केले. काही विद्यार्थिनींनी सावित्रीबाईं चे जीवन दर्शन घडवण्यासाठी सावित्रीबाईचा वेश परीधान केला होता.
या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कृतिका कोकडे व गौरी जबडे या विद्यार्थ्यानी तर आभार कृतिका कोकडे व राजराजेश्वरी कोंबे या विद्यार्थ्यानी केले.

