मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन:- हिंगणघाट शहरात यशवंत नगर येथील घरीत दोन अज्ञात चोरट्यांनी प्रवेश करुन घरात पुजा करीत असलेल्या महिलेचा हाथ पकडून पैसे व सोन्याची मागणी केली. यावेळी महिलेने प्रसंगावधान दाखवित एकाच्या हाताला चावा घेऊन आरडाओरडा केली असता चोरट्यांनी महिलेच्या हातावर चाकुने वार करून पळ काढल्याची घटना २८ जुलै रोजी सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान घडली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांकडून चोरट्यांचा शोध घेण्याचे काम सुरू होते.
२८ जुलै रोजी साडेसात वाजताच्या सुमारास यशवंत नगर येथील रहिवासी आरती शैलेश तन्ना वय ४६ वर्ष हा आपल्या घरात पुजा करीत असताना अचानक दोन अज्ञात युवकांनी घरात प्रवेश केला व महिलेचा हात पकडून घरातील पैसे दे सोन दे म्हणत अवाज करून नका अशी धमकी दिली. यावेळी महिलेने प्रसंगावधान दाखवित चोरट्यांच्या हाताला चावा घेतला मात्र चोरट्यांनी महिलेच्या हातावर चाकुने वार केला. महिलेने आरडाओरडा करताच दोन्ही अज्ञात चोरट्यांनी घरासमोर त्यांनी आणलेल्या दुचाकीवरून पळ काढला. यावेळी काही वेळा दुचाकी सुरू होत नसल्याने त्यांनी दुचाकी हाताने धकलत नेली व पसार झाले.
घटनेचे गांर्भिय लक्षात घेऊन अतिरिक्त पोलीस अधिक्षक वाघमारे, उपविभागीय पोलीस रोशन पंडित, ठाणेदार देवेंद्र ठाकूर यांच्या पोलिस फॉरेन्सिक टिम, डॉग स्काॅटला पाचारण करण्यात आले होते. वर्धा येथील एलसीबीचे तिन पथक अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी शहरात आले होते. यावेळी अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी अनेक ठिकाणी सिसीटिव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून शोध घेणे सुरू होते. मात्र हिंगणघाट शहरात लाखो रुपया खर्च करून लावण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे कुचकामी ठरले आहे. एकूणच शहरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

