मधुकर गोंगले उपसंपादक.
मो. नं. 9420751809.
अहेरी :- आदिवासी विविध सहकारी संस्था मर्या. सोसयटी मार्फत उशिरा आधार भूत धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले असल्याने कर्ज घेतलेले व बिन कर्जदार शेतकऱ्याचे धान शिल्लक आहेत तसेच काही शेतकरी धान विक्री केले असून बिलींग व चुकारे न मिळाल्यामुळे कर्ज परतफेडीसाठी मुदतवाढ मिळवण्यासाठी अहेरी पंचायत समितीचे माजी सभापती भास्कर तलांडे यांनी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या धानाची बिलींग व चुकारे न मिळाल्यामुळे या परिसरातील शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणींत सापडले आहे. दरवर्षी शेतकरी मार्च ३१ या तारखेची वाट न बघता, धानाचे चुकारे मिळाले कि लगेच कर्ज फेड करायचे, कर्ज फेडीसाठी ३१ मार्च ही तारीख महत्त्वाची नाही आहे, परंतु शेतकऱ्यासाठी धानाचे चुकारे मिळणे महत्त्वाचे आहे.अशा परिस्थितीत यावर्षी अनेक शेतकरी कर्ज फेडीसाठी व दिलेला शब्द पाळावा म्हणून,घरातील सोने गहाण ठेवून काही खाजगी कर्जाची परतफेड करण्यासाठी धावपळ करीत आहे. दिलेल्या धानाची बिलिंग न होणे व झालेल्या बिलिंग चे पैसे न मिळणे हा गलिच्छ प्रकार पहिल्यांदाच बघायला मिळत आहे, यात शेतकरी अधोगतीला लागले आहेत, याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित होतो.
पिक कर्ज फेडीसाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या धानाची बिलिंग होण्यापासून तर चुकारे मिळण्याच्या कालावधी पर्यंत जेवढा कालावधी लागू शकतो, तसेच उर्वरित शेतकऱ्यांच्या धान खरेदी साठी व कर्ज फेडण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी. अशी मागणी माजी सभापती भास्कर तलांडे यांनी पत्रकातून केली आहे.

