विश्वास त्रिभुवन, अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर:- अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील पाचव्या माळावर एका व्यक्ती विष प्राशन केल्याने संपूर्ण जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली आहे. श्रीगोंदे तालुक्यातील घोटवी येथील सरपंच अविनाश चव्हाण यांनी विषारी औषध सेवन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न मंगळवारी दि.29 केला. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियुक्त पोलीस कर्मचारी इरफान फजहल शेख यांनी धावत जाऊन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले.
घोटवी येथील सरपंच अविनाश चव्हाण यांनी विषारी औषध सेवन केल्याची माहिती समजताच खालच्या मजल्यावर असलेल्या इरफान शेख या पोलिस कर्मचार्यांनी तातडीने पाचव्या मजल्यावर धाव घेऊन त्याला प्राणवायू देण्याचा प्रयत्न केला. चव्हाण यांच्या खिशात एक चिठ्ठी सापडली असून, त्यात घोटवी येथील ते सरपंच असल्याचे नमूद करण्यात आले आहे. प्रेम प्रकरणातून होणार्या त्रासाला कंटाळून आपण आज आत्महत्या करत असल्याचे चिठ्ठीत त्यांनी नमूद केले आहे. या घटनेनंतर चव्हाण यांना अधिक उपचारासाठी अहमदनगरच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची पोलिसाना प्राप्त होतात. पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
काय आहे प्रकरण..
श्रीगोंदा तालुक्यातील घोटवी गावात निवडणुका झाल्यानंतर अविनाश चव्हाण हे या गावाचे सरपंच झाले. त्यानंतर त्याचं गावातील एका विवाहित महिलेसोबत प्रेम संबंध होते. या प्रकरणाची गावात कुणकुण लागल्यानंतर विवाहितेच्या पतीने आणि त्याच्या घरच्यांनी याला विरोध केला. संबंधित महिलेला पतीन माहेरी पाठवून दिले. माहेरी गेल्यानंतर आपल्याला मारहाण होत असल्याची तक्रार महिलेने प्रेम सरपंच चव्हाण याच्याकडे केली. त्यानंतर त्याने आमच्या दोघांचे एकमेकांवर प्रेम आहे, आम्ही एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत, आम्हाला त्रास देत असल्याची तक्रार करण्यासाठी सरपंच अविनाश चव्हाण याने थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले.
जिल्ह्याधिकाऱ्यांना अविनाश चव्हाण याने एक पत्र लिहिले. “आमचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण आम्हाला सोबत राहू देत नाही”, असं म्हणत अविनाशने कार्यालयाच्या पाचव्या मजल्यावर विष घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला

