Friday, February 13, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home महत्त्वाच्या बातम्या

ठाणे येथील तलावपाळी परिसर कायमस्वरुपी फेरीवाला मुक्त ठेवण्याचे निर्देश: मनपा आयुक्त अभिजीत बांगर

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 17, 2023
in महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, मुंबई
0 0
0
ठाणे येथील तलावपाळी परिसर कायमस्वरुपी फेरीवाला मुक्त ठेवण्याचे निर्देश: मनपा आयुक्त अभिजीत बांगर
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

तलावपाळी परिसरातील फेरीवाल्यांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करुन द्यावी : आयुक्त अभिजीत बांगर

अनधिकृत गरीब फेरीवाले दिसले जे दिवसभर मेहनतीने दोन पैसा कमावतात पण करोडो रुपये कमावणारे अनधिकृत बांधकामे/ भूमाफिया आयुक्तांना कधी दिसणार:- ठाणेकरांचा सवाल

महाराष्ट्र संदेश न्युज ऑनलाईन ठाणे :- ठाणे शहराचा मानबिंदू समजला जाणारा परिसर म्हणजे तलावपाळी. ठाणेकरांच्या जिव्हाळ्याच्या असलेल्या या परिसरात दररोज मॉर्निंगवॉक पासून ते संध्याकाळपर्यत नागरिकांची रेलचेल सुरू असते. या परिसरात नागरिकांना मोकळेपणाने फिरता यावे यासाठी सदरचा परिसर हा फेरीवाला मुक्त करण्यात आल्याने नागरिकांनाही मुक्तपणे वावरणे शक्य होत आहे. वर्षानुवर्षे या ठिकाणी असलेल्या नोंदणीकृत फेरीवाल्यांचे योग्य पुनर्वसन होऊन त्यांचे उपजीविकेचे साधन कायम रहावे याकरिता फेरीवाल्यांसाठी पर्यायी जागा निश्चित करुन त्याचा खाऊगल्ली म्हणून विकास करण्याचे निर्देश आज महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले.

आज आयुक्त अभिजीत बांगर यांनी संपूर्ण मासुंदा तलावाची पाहणी केली. या पाहणी दौऱ्यास उपायुक्त अतिक्रमण जी.जी. गोदेपुरे, उपायुक्त शंकर पाटोळे, सहाय्यक आयुक्त अजय एडके आदी उपस्थित होते.

सद्यस्थ‍ितीत संपूर्ण तलाव परिसर फेरीवाला मुक्त करण्यात आला आहे. तलावपाळी परिसरातील फेरीवाल्यांसाठी पर्यायी जागा निश्चित करून त्या जागेचा खाऊ गल्ली म्हणून विकास करण्यात यावा. सदर ठिकाणी पिण्याचे पाणी, विद्युत दिवे आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात मात्र तलावपाळीच्या आजूबाजूचा परिसर कोणत्याही परिस्थितीत फेरीवाला मुक्त राहिल याची दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी आयुक्त श्री. बांगर यांनी दिल्या.

या पाहणी दौऱ्या दरम्यान संपूर्ण मासुंदा तलावाची पाहणी करुन नागरिकांना बसण्यासाठी असलेले कठडे दिवसातून किमान दोन वेळा धुवून स्वच्छ करुन परिसर नीटनेटका राहील याची दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले. तलावाभोवती असलेले सुशोभित विद्युतपोलची आवश्यक देखभाल करुन ते कायमस्वरुपी सुस्थितीत राहतील. तसेच संपूर्ण तलावाभोवती आतील बाजूस एलईडी दिवे लावण्यात यावे, जेणेकरुन त्याचे प्रतिबिंब पाण्यात पडून या परिसराच्या सुशोभिकरणात भर पडेल या दृष्टीने कार्यवाही करण्याच्या सचूनाही त्यांनी दिल्या. तसेच पाणपोईलगतची जागा स्वच्छ राहिल तसेच पाणपोईची पाण्याची टाकी नियमित स्वच्छ करुन शुद्ध पाणी नागरिकांना मिळेल याकडे लक्ष देण्याच्या सूचना संबंधितांना श्री. बांगर यांनी दिल्या.

तसेच तलाव परिसरामध्ये ठिकठिकाणच्या भिंती, उड्डाणपुलाचे खांब, विद्युत ङिपी व कठड्याला जाहिरात पत्रके चिटकविल्याचे दिसून आले, यामुळे या ठिकाणच्या सुशोभिकरणाला बाधा निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आली. तरी संपूर्ण तलाव परिसरातील भित्तीपत्रके तातडीने काढून आगामी काळात कोणतीही भित्तीपत्रके लागणार नाही याची दक्षता घेवून दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही आयुक्त श्री. बांगर यांनी दिले.

ठाणे रेल्वेस्थानक परिसर फेरीवाला मुक्त असावा: ठाणे रेल्वेस्थानकात दररोज 6 ते 7 लाख प्रवाशी प्रवास करत असून पश्चिमेकडील बाजूस 70 टक्के तर पूर्वेकडील बाजूस 30 टक्के प्रवासी ये-जा करतात. त्यामुळे सकाळ व संध्याकाळच्या वेळेस या परिसरात गर्दी असते. या नागरिकांना सुलभतेने ये-जा करता यावी या दृष्टीने 150 मीटरच्या परिसरात एकही फेरीवाला राहणार नाही या दृष्टीने नियोजन करुन पोलीस कर्मचारी तैनात करण्याचे निर्देशही त्यांनी उपायुक्तांना दिले.

अतिक्रमणावर ठोस कारवाई करा : ठाणे स्टेशन परिसर, तलावपाळी परिसर, नागरिकांची सार्वजनिक वावर असलेली ठिकाणे कायमस्वरुपी मोकळी राहतील या दृष्टीने नियोजन करण्यात यावे. सदर परिसर अतिक्रमणमुक्त करताना थातुरमातुर कारवाई न करता ठोस कारवाई करावी, जेणेकरुन एकदा कारवाई झाल्यावर पुन्हा त्याच जागेवर अतिक्रमण होणार नाही या दृष्टीने कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त श्री. बांगर यांनी दिले.

Previous Post

ATM मध्ये जाऊन लोकांना बोलण्यामध्ये ठेवून हात चलाखीने एटीएम अदलाबदल करून फसवणूक, चार गुन्हेगारांना अटक केले.

Next Post

मिरा-भाईंदर येथील नागरिकांसाठी महानगर पालिके तर्फे महत्वपूर्ण आव्हान.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मिरा-भाईंदर येथील नागरिकांसाठी महानगर पालिके तर्फे महत्वपूर्ण आव्हान.

मिरा-भाईंदर येथील नागरिकांसाठी महानगर पालिके तर्फे महत्वपूर्ण आव्हान.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In