Sunday, June 22, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त श्री. भीमराव केशवराव कडू यांची महाराष्ट्र संदेश न्युजचे युवराज मेश्राम यांनी घेतलेली विशेष मुलाखत.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
January 28, 2023
in Uncategorized, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, विदर्भ
0 0
0
उद्यान पंडित पुरस्कार प्राप्त श्री. भीमराव केशवराव कडू यांची महाराष्ट्र संदेश न्युजचे युवराज मेश्राम यांनी घेतलेली विशेष मुलाखत.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

युवराज मेश्राम, विदर्भ ब्यूरो चीफ

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन नागपुर:- आज राज्यात शेतकरी राजा वेळोवेळी येणाऱ्या आस्मानी सुलतानी संकटामुळे हवालदिल होत असताना नागपुर जिल्हातील कळमेश्वर पासून अवघ्या15 किलोमीटर अंतरावर असलेल्या पारडी देशमुख या गावातील यशस्वी शेतकरी श्री. भीमराव केशवराव कडू या शेतकऱ्याने आधुनिक फळबागेची लागवड करत लाखोंचे उत्पन्न घेतले आहे. या प्रयोगशील शेतकऱ्याची ही प्रेरणादायी यशोगाथा.

भीमराव कडू यांच्याजवळ एकूण 35 एकर शेती असून या शेतीमध्ये भीमराव, राजेंद्र, पराग, माधवराव, प्रकाश व प्रशांत हे 6 ही भाऊ सामूहिक शेती करतात. यामध्ये संत्रा बगीच्या 3400 झाडे, चिकूची 80 झाडे, मोसंबीची 2500 झाडे आहे. येणाऱ्या 200 संत्रा झाडाला जवळपास 200 टन संत्रा असून पाणीपुरवठा करता तीन विहिरी, तीन बोरवेल आहेत. परंतु संत्रा फळ पिकाच्या उत्तमरीत्या सुव्यवस्थापन करून पुणे येथे हे ग्राहकांना थेट विक्री करतात. संत्रा पिक लागवड विषयी श्री भीमराव कडू यांची सुव्यवस्था कशी करायची. असा संदेश शेतकरी बांधवांना दिला.

संत्रा फळपीक लागवड व व्यवस्थापन
निचरा असलेली जमीन तपासून व माती परीक्षण करून चांगला खात्रीच्या रोपांची शासकीय किंवा खाजगी रोपवाटिकेतून खरेदी करावी. नवीन जागेवरती लागवड विशेष फायद्याची असते. प्रथमतः जमिनीची मशागत करून उत्तर दक्षिण 10 फूट पूर्व पश्चिम 20 फुट अशा अंतरावर खड्डे करून वरील माती व कंपोस्ट खत टाकून, खड्डे भरून घ्यावे. त्याचप्रमाणे पावसाळा सुरू झाल्यावर परिपक्व कलमांची लागवड करावी. जर अडचण आल्यास रब्बीमध्ये पण लागवड करता येते. ती सुद्धा शेतकऱ्यांना फायद्याची असते.

पाणी व्यवस्थापन विषयी बोलायचं झाल्यास पाणी व्यवस्थापन करताना ठिंबक सिंचन असल्या शिवाय लागवड करू नये. कारण पाण्याची पातळी ही दिवशी ते दिवस खोल जात आहे पाण्याची कमतरता भासत आहे म्हणून कमी पाण्यात जास्त उपयोग करून झाडाला नियोजन बद्ध पाणी देता येते. त्यामुळे झाडांना डिंक किंवा मूळ कुजण्याची शक्यता कमी असते. ठिंबकमुळे अंतर मशागत करता द्रवरुपात खतांची मात्रा देता येते. त्यामध्ये मजुरी वाचून कमी खर्चात व्यवस्थापन करता येते. त्याचप्रमाणे झाडाच्या छाटणी विषयी बोलायचं झाल्यास, एक वर्षापासून तीन वर्षापर्यंत जमिनीपासून एक फुट उंच सोडून बाकीच्या फांद्या होईल अशा पद्धतीने दरवर्षी छाटणी करणे भाग पडते. त्यामुळे झाड हे उभाट न वाढता झाडांच्या आकारमान व पानांची संख्या वाढेल व त्यामुळे उत्पादनात सुद्धा वाढ होईल. झाडाला बेगणीची गरज सुद्धा भासणार नाही. अशा तऱ्हेने एकाग्र चित्ताने बाग तयार केल्यास पाच ते सहा वर्षात हेक्टरी 30 टन उत्पादन शेतकऱ्यास घेता येते.

विक्री व्यवस्थापन याविषयी बोलायचं झाल्यास उत्पादन जरी जास्त झाले तर मालाला भाव कमी असते परंतु स्वतः विक्री करायची तयारी असली तरच कुठल्याही परिस्थितीत तोटा होणार नाही. कारण बागाची लागवड जास्त होत आहे. संत्रा जास्त पिकत आहे म्हणून स्वतःच विक्रीची जबाबदारी घ्यावी. ग्राहकास थेट विक्री करावी. तरच संत्रा शेती फायद्याची आहे. हा संदेश माझा व शेतकरी बांधवांना घेता येईल. यांच्या शेती स्थळी तालुका कृषी अधिकारी प्रकाश वसु साहेब व कृषी सहाय्यक अधिकारी यांनी भेट दिली असता अनेक शेतकरी हजर होते व यांच्या योग्य मार्गदर्शनाचा लाभ अनेक शेतकऱ्यांना मिळाला असल्याची माहिती भिमरावजी कडू यांनी महाराष्ट्र संदेश न्यूजचे विदर्भ ब्यूरो चीफ युवराज मेश्राम यांना देण्यात आली.

आपल्या परिसरातील बातम्या व घडामोडी बघण्याकरीता आजच महाराष्ट्र संदेश न्यूजच्या वेबसाईट www.maharashtrasandesh.com ला भेट द्या. 9766445348/7385445348

Previous Post

आवास योजनेंतर्गत घरकुलांचे कामे मार्चपर्यंत पुर्ण करा, आष्टी व कारंजा पंचायत समितीचा आढावा.

Next Post

मिरा भाईंदर पालिकेला सार्वजनिक बांधकाम, मिळकत, विद्युत व सचिव विभागास आयएसओ 9001: 2015 मानांकन प्राप्त झाल्याने सन्मानित

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
मिरा भाईंदर पालिकेला सार्वजनिक बांधकाम, मिळकत, विद्युत व सचिव विभागास आयएसओ 9001: 2015 मानांकन प्राप्त झाल्याने सन्मानित

मिरा भाईंदर पालिकेला सार्वजनिक बांधकाम, मिळकत, विद्युत व सचिव विभागास आयएसओ 9001: 2015 मानांकन प्राप्त झाल्याने सन्मानित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In