संतोष मेश्राम, चंद्रपूर ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन चंद्रपूर / राजुरा :- काँग्रेसचे राष्ट्रीय नेते जननायक राहुलजी गांधी यांनी भारत जोड़ो यात्रेच्या माध्यमातून व्यापक जनसंपर्क करून जनतेच्या मनातील भावना, वेदना, व्यथा, अपेक्षा सर्व जानून घेतल्या आणि यात्रेदरम्यान आलेले अनुभव, जनतेचे प्रश्न घेऊन त्यांनी संसदेच्या पटलावर ठेवले. राहुलजींचे विचार, अनुभव लोकांपर्यंत पोहोचवून जनजागृती करण्यासाठी काँग्रेस नेते, माजी मंत्री विजयभाऊ वडेट्टीवार, खासदार बाळुभाऊ धानोरकर, आमदार सुभाषभाऊ धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या पासून चंद्रपूर जिल्ह्य़ात युवक काँग्रेस हात से हात जोडो अभियान सुरू करीत असल्याची माहिती चंद्रपूर युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी दिली आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रातून या अभियानाला सुरूवात होऊन पुढे जिल्हय़ातील सर्व विधानसभा क्षेत्रात हे अभियान राबविण्यात येणार आहे.
ते पुढे म्हणाले की, आता पर्यंत युवक काँग्रेसने चंद्रपूर जिल्ह्य़ात जवळपास १०० युवक काँग्रेसच्या शाखा गठीत करून मोठय़ा उत्साहाने जनसंपर्क, जनसेवेच्या कामाला सुरुवात केली आहे. तसेच त्यांच्या माझे गाव माझी शाखा या उपक्रमातूनही हजारो युवक काँग्रेसशी जुडून पक्षाचे विचार लोकांपर्यंत पोहोचवित आहेत. आजपासून सुरू झालेल्या हात से हात जोडो अभियानातून युवक काँग्रेसच्या कामाला अधिक गतिमान करून जिल्हात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. एवढेच नव्हे तर राहुलजींचा पुढील संदेश की, आपल्यामधील द्वेष आणि भांडणे देशाच्या विकासातील अडथळे आहेत. आपण सर्व जात, धर्म, प्रांत, भाषा या मतभेदांच्या वर उठून विविधतेत एकता ही ओळख पक्की करू. तसेच ते सांगतात की घाबरू नका आपल्या मनातील भीती काढून टाका सत्याला सामोरे जा- द्वेष आपोआपच समाजातून नष्ट होईल हा विचार सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी ही हात से हात जोडो अभियान राबविण्यात येणार आहे.
तसेच देशाला अंधारातून प्रकाशाकडे, द्वेषातून प्रेमाकडे आणि निराशेतून- आशेकडे नेणे, हे ध्येय साध्य करण्यासाठी भारताला महान संविधान देणाऱ्या महापुरुषांनी सांगितलेली तत्वे आणि मूल्ये यांना आदर्श मानून पुढे जाणे या प्रमुख बाबी आणि अधिकाधिक युवक व नागरीकांपर्यंत पोहचून काँग्रेसची विचारधारा, विविध विकासकामे आणि एकता, अखंडता, बंधुतेचा संदेश घेऊन आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीने “हात से हात जोडो” हे अभियान राबवीत आहोत आपण सर्वांनी या मोहिमेत भाग घेऊन काँग्रेसच्या हाताला हात जोडून एक सुवर्ण भारताच्या उभारणी करीता आमची साथ द्यावी जिथे प्रत्येक भारतीयाला स्वप्न पाहण्याची आणि ती पूर्ण करण्याची समान संधी असेल चला तर मग, काँग्रेसच्या हातासे हात जोडो अभियानात सहभागी होऊन हे अभियान आणि आपले येणारे भविष्य उज्वल करू या असे आवाहन चंद्रपूर जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शंतनु धोटे यांनी केले आहे.

