Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

स्वातंत्र्याच्या अमृतोमत्सवा निमित्त ‘आप’ ने काढली दीक्षाभूमी वरून तिरंगा रॅली.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 14, 2022
in Uncategorized, देश विदेश, महाराष्ट्र, राजकीय
0 0
0
स्वातंत्र्याच्या अमृतोमत्सवा निमित्त ‘आप’ ने काढली दीक्षाभूमी वरून तिरंगा रॅली.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

दिल्ली मॉडेल संपूर्ण विदर्भात राबवण्यासाठी पक्ष निवडणूक लढवणार – महादेव नाईक, गोवा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री आणि महाराष्ट्र निवडणूक प्रभारी

विदर्भ आणि महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाच्या हृदयापर्यंत पक्ष पोहोचला आहे – महाराष्ट्र संयोजक रंगा राचुरे.


देवेंद्र सिरसाट, हिंगणा तालुका प्रतिनिधी

नागपूर:- देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होत असलेल्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा एक भाग म्हणून स्वातंत्र्य दिनानिमित्त आम आदमी पक्षाने तिरंगा रॅलीचे आयोजन केले होते. गोवा राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा महाराष्ट्र निवडणूक प्रभारी महादेव नाईक व महाराष्ट्र संयोजक रंगा राचुरे यांच्या हस्ते झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. तिरंगा यात्रा सुरू करण्यापूर्वी दीक्षाभूमीवर पुष्पहार अर्पण करण्यात आला. यानंतर रॅलीची सुरुवात – लोकमत चौक – व्हरायटी चौक – बर्डी मेन रोड – लोहापुल – आगारामदेवी चौक – वैद्यनाथ चौक – मेडिकल चौक – क्रीडा चौक – कमला नेहरू कॉलेज – सक्करदरा चौक – तिरंगा चौक – मंगलमूर्ती लॉन – जगनाडे चौक – रेशीमबाग चौक – श्री संत गुलाबबाबा सेवा आश्रम, ग्रेट नाग रोड, सिरसपेठ,   लोकांची शाळा जवळ समाप्त झाली.

रॅलीदरम्यान महाराष्ट्राचे खजिनदार जगजित सिंग यांनी ठिकठिकाणी सर्वसामान्यांना प्रबोधन करून स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे आवाहन केले. रॅलीत शेकडो कार्यकर्ते देशभक्तीपर गाण्यांवर थिरकले. रॅलीदरम्यान ‘वंदे मातरम’, ‘भारत माता की जय’च्या  घोषणाही देण्यात आल्या. यावेळी त्यांच्यासोबत इतर सर्वसामान्य नागरिक आणि लहान मुलेही उपस्थित होते.

यानंतर संत गुलाबबाबा सेवा आश्रमात आम आदमी पार्टी विदर्भाचे पदाधिकारी अधिवेशन पार पडले. सुरुवातीलाच राज्याचे निवडणूक प्रभारी मा.महादेव नाईक यांनी दिल्ली मॉडेल महाराष्ट्रातील गल्लीबोळात नेनार ऐसे सांगितले व येणाऱ्या सर्व निवडणुका लढवणार. आम आदमी पार्टी दिल्लीसारखी मोफत पाणी, दर्जेदार शाळा बनण्याच्या तयारीत आहे. नगर पंचायत, नगरपरिषद व महानगरपालिकेच्या माध्यमातून हे काम पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अमृत महोत्सवानिमित्त तमाम देशवासियांना राष्ट्रीय तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले. मागील तीन दिवसात राज्यातील सर्व विभागांमध्ये पदाधिकारी अधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. सर्वच शहरे आणि खेड्यापाड्यात सर्वसामान्य जनता पक्षात सामील होत असल्याचे पाहायला मिळाले. आमचा पक्ष खूप वेगाने वाढत आहे. आता राज्यातील राजकीय परिस्थिती अस्थिर आहे, त्याचा पर्याय फक्त आम आदमी पक्ष आहे.

देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असताना जनतेला उत्तम शिक्षण, आरोग्य सेवा, मोफत पाणी आणि वीज उपलब्ध करून देऊन अमृत महोत्सवाचा आनंद लुटण्याचे भाग्य आपण संपूर्ण देशात निर्माण करू. दिल्ली मॉडेल पंजाबपासून गुजरातपर्यंत आणि संपूर्ण देशात राबवणार आणि अरविंदजींचा संकल्प पूर्ण करण्यासाठी राज्य संयोजक श्री.रंगा राचुरे यांनी महाराष्ट्रात संघटना विस्ताराचे काम सुरू करण्याच्या तयारीची माहिती दिली.

विदर्भातील सर्व निवडणुका आम्ही तयारीनिशी लढू आणि जिंकू, अशी माहिती आपचे विदर्भ अध्यक्ष डॉ.देवेंद्र वानखेडे यांनी दिली. यासाठी आमचे सर्व अधिकारी आपापल्या जिल्ह्यात परिश्रम घेत आहेत. येत्या निवडणुकीत त्याचा नक्कीच फायदा होईल. आजच्या अधिवेशनात सर्व जिल्हा अधिकारी व विदर्भ  पदाधिकारी उपस्थित आहेत. विशेषत: राज्य युवा संयोजक श्री.अजिंक्य सिंदे, राज्य कोषाध्यक्ष श्री.जगजित सिंग, राष्ट्रीय परिषद सदस्य श्री.अंबरीश सावरकर, श्री.अशोक मिश्रा, सचिव अविनाश श्रीराव, सहसचिव डॉ.केशव बांते, विदर्भ आरोग्य शाखा प्रमुख डॉ. जाफरी, किसान आघाडीचे प्रमुख श्री.मनोहर पलवार, युवा राज्य समिती सदस्या कृतल आकरे.

Previous Post

भारतातील कोट्यावधी बहुजनांना खरे स्वातंत्र मिळाले आहे काय??

Next Post

विनायक मेटे यांच्या अपघातानानंतर IRB चा हलगर्जीपणा, कोट्यवधी रुपयांचा टोल घेणारे IRB ची सुरक्षा यंत्रणा बेपत्ता.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
विनायक मेटे यांच्या अपघातानानंतर IRB चा हलगर्जीपणा, कोट्यवधी रुपयांचा टोल घेणारे IRB ची सुरक्षा यंत्रणा बेपत्ता.

विनायक मेटे यांच्या अपघातानानंतर IRB चा हलगर्जीपणा, कोट्यवधी रुपयांचा टोल घेणारे IRB ची सुरक्षा यंत्रणा बेपत्ता.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In