बालाजी शिंदे, पुणे प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज! ऑनलाईन पुणे:- गेल्या मार्च, एप्रिल आणि आता मे महिन्यांपासून राज्यातील काही भागात अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिल्यामुळे ऐन उन्हाळ्यात वादळी वाऱ्यासह कोसळलेल्या पावसामुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाला आलेला घास निसर्गाने हिरावून घेतला आहे. शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
राज्यातील सोलापूर, जळगाव, संभाजी नगर, लातूर, वाशिम, नाशिक, बुलढाणा, नांदेड, अकोला, पालघर, यवतमाळ, नागपूर, बिड, धुळे जिल्हातील शेतकऱ्यासाठी शासनाची मदत जाहिर झाली पण स्थानिक प्रशासनाच्या उदासीन धोरण अवलंबिले असल्याने राज्यातील अनेक शेतकरी या मदती पासून वंचित आहे. ही मदत प्रशासणाच्या कार्यालयात अडकून पडली आहे. सरकारी काम आणि 50 दिवस थांब अस चित्र दिसून येत आहे.
यंदा शेतकरी अनेक संकटाचा सामना करत आहे. एकीकडे अवकाळी आणि गारपीट तर दुसरकडे शेत मालाला मिळणाऱ्या कमी भावामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता अवकाळी आणि गारपीट झाल्यामुळे शेतकरी अनेकदा संकटात सापडला आहे. त्यामुळे आता सत्ताधारी मंत्र्यांकडून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतीच्या नुकसानीची पाहणी केली जात आहे.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना 177 कोटीची आर्थिक मदत देण्याची घोषणा केली होती. मात्र ही घोषणा पोकळ तर नाही अस दिसून येत आहे मदतीची घोषणा तर सरकार कडून करण्यात आली पण मार्च मध्ये अवकाळी पावसामुळे बाधीत शेतकरी अजून मदती पासून वंचित आहेत.

