मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हात मोठ्या प्रमाणात अवैध व्यवसायाला उत आला त्या काही भ्रष्ट पोलिसांच्या सहभागाने तो मोठ्या प्रमाणात फुलला आहे. जिल्हातील पोलीस अधीक्षक नुरूल हसन हे जरी प्रामाणिक प्रयत्न करून हे अवैध धंदे बंद करण्याचा धडाका लावला आहे. नुरूल हसन यांच्या कारवाई बघून जिल्हात अवैध धंदे कमी झाले आहे. पण काही भ्रष्ट पोलिस आपल्या कर्तव्याला काळीमा फासत आहे. अशीच एक पोलीस प्रशासना खळबळजनक घटना समोर आली आहे.
वर्धा शहरातील अवैध धंदे वाल्यांशी अर्थपूर्ण संबंध प्रस्थापित करून त्यांना या अवैध धंदे करण्यास आशीर्वाद दिल्याचा आरोप वर्धा येथील तीन पोलीस कर्मचाऱ्यावर करण्यात आला होता. जिल्हा पोलिस अधीक्षक नुरुल हसन यांच्या समोर हे प्रकरण येताच त्यांनी या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना तत्काळ कारवाई करत निलंबित केले. त्यामुळे पोलीस प्रशासनात एकच खळबळ माजली आहे. पवन देशमुख, धीरज राठोड, राकेश इतवारे असे निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहे.
सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार, पवन देशमुख, धीरज राठोड, राकेश इतवारे हे पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांच्या विशेष पथकात कार्यरत होते. त्यांनी वर्धा शहरातील इतवारा भागातील आनंदनगर येथे राहणाऱ्या एक अवैध धंदेवाल्याकडून 30 हजाराची मागणी केली आणि ती रक्कम स्वीकारल्याचा आरोप या तीन पोलीस कर्मचाऱ्यावर करण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी संबंधित प्रकरणात आरोप असलेले तिन्ही पोलिसांना निलंबीत करण्याचे आदेश दिले. त्यांचे ‘सस्पेशन आर्डर’ देखील त्यांना सुपुर्द करण्यात आली आहे. इतकेच नव्हे तर या गंभीर प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश एका वरिष्ठ अधिकाऱ्याला देण्यात आहे आहे.

