Thursday, May 14, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home Uncategorized

कृषी विभाग व आत्मा यांच्या वतीने झरी येथे रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 23, 2022
in Uncategorized, तंत्रज्ञान, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र
0 0
0
कृषी विभाग व आत्मा यांच्या वतीने झरी येथे रानभाजी महोत्सव उत्साहात साजरा.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

नितेश पत्रकार तालुका प्रतिनिधी 7620029220
झरी:-
महाराष्ट्र शासन कृषी विभाग, तालुका कृषी अधिकारी कार्यालय झरी व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) झरी यांचे तर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व जागतिक आदिवासी दिनाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सव प्रदर्शन व विक्री चे २२ऑगस्ट २०२२ रोजी झरी येथील पंचायत समिती सभागृहात आयोजन करण्यात आले होते. रानभाजी महोत्सव चे उद्घाटक (तहसीलदार)गिरीश जोशी, प्रमुख पाहुणे (गटविकास अधिकारी)रविकुमार सांगळे ,(आत्मा तालुका समिती अध्यक्ष)संजय दातारकर,प्रमुख मार्गदर्शक (तालुका कृषी अधिकार)अमोल आमले,यांच्या उपस्थितीत रानभाजी महोत्सव कार्यक्रमला सुरुवात झाली.

पावसाळ्यात विविध गुणधर्म असणाऱ्या अनेक वनस्पती उगवतात त्यातील अनेक वनस्पती खाण्यायोग्य असतात त्यांना आपण रानभाज्या म्हणून ओळखतो. त्यातील काही रानभाज्या शरीरासाठी अत्यंत उपयुक्त व औषधीही असतात. अशा रानभाज्यांची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी तालुका कृषी विभागाने स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवाचे औचित्य साधून रानभाजी महोत्सव आयोजित केला असल्याची माहिती कृषी अधिकारी अमोल आमले यांनी दिली.रानभाज्यांचे महत्त्व सर्वसामान्यापर्यंत जाण्यासाठी अशा महोत्सवांची व्याप्ती वाढविणे ही काळाची गरज आहे. रानभाजी महोत्सवामुळे रानभाज्यांना चांगले मार्केट लाभेल. त्यामुळे शेतकऱ्यांना अशा भाज्यांचे चांगले भाव मिळतील याबरोबरच जनतेला माहिती नसणाऱ्या भाज्यांचीही ओळख होईल. जून-जुलैच्या पावसाबरोबर सुरु झालेला रानभाज्यांचा हंगाम ऑक्टोबर पर्यंत चालतो. रानभाज्या निसर्गाताच उगवून येत असल्यामुळे त्या सेंद्रीय असतात त्यांची पौष्टीकताही चांगल्या दर्जाची असते. निसर्गाताच निर्माण झालेल्या या रानभाज्या जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभागाने रानभाज्यांच्या महोत्सवांचे सुसज्य आयोजन केले आहे. श्रावण महिन्यात निसर्गात उपलब्ध होणाऱ्या परंतु आपल्याला ओळख नसलेल्या व रोजच्या आहारात अनन्य साधारण महत्व असलेल्या रानभाज्या प्रदर्शन व विक्री मेळावा येथील पंचायत समिती सभागृहात सकाळी १० ते सायंकाळी ५ वाजेर्यंत आयोजित करण्यात आला होता.

या रानभाजी महोत्सवामध्ये प्रदर्शन व विक्री चे आयोजन करण्यात आले होते. महोत्सवामध्ये भाज्या व रानफळे चे प्रदर्शन भरविण्यात आले होते व त्याची विक्री महोत्सवामध्ये करण्यात आली. महोत्सवामध्ये विविध रानभाजी व रानफळे चे ओळख, वैशिष्ट्ये, औषधी गुणधर्म इत्यादी सचित्र माहिती उपस्थित शेतकऱ्यांना व नागरिकांना देण्यात आली.

रानभाजी महोत्सव कार्यक्रम यशस्वितेकरिता(तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक) मनोज जाधव, (मंडळ कृषी अधिकारी) हटवार,(कृषी पर्यवेक्षक)नामदेव किनाके,सर्व कृषी सहाय्यक व कृषीमित्र यांनी परिश्रम घेतले.यावेळी कृषी सहाय्यक प्राची उईके, नम्रता कुमरे, राजू कुळमेथे, पर्यवेक्षक फुलझेले, (कृषिमित्र) निलेश भोयर, तालुक्यातील शेतकरी, सर्व कृषी विभाग कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

चोपडा शहर पोलीसांची धडाकेबाज कारवाई, 12 गावठी बनावटीचे पिस्टल व 5 जिवंत काडतुसांसह जवळपास 2,77000 रुपयेचा मुद्देमालासह दोन आरोपी अटक

Next Post

इंजिनिअरिंग डिप्लोमा इत्यादी शिक्षण घेणाऱ्या मुलींना प्रत्येक वर्षाला 50 हजार रुपये पर्यंतचे शिष्यवृत्ती राज्य सरकारची घोषणा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
इंजिनिअरिंग डिप्लोमा इत्यादी शिक्षण घेणाऱ्या मुलींना प्रत्येक वर्षाला 50 हजार रुपये पर्यंतचे शिष्यवृत्ती राज्य सरकारची घोषणा.

इंजिनिअरिंग डिप्लोमा इत्यादी शिक्षण घेणाऱ्या मुलींना प्रत्येक वर्षाला 50 हजार रुपये पर्यंतचे शिष्यवृत्ती राज्य सरकारची घोषणा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In