✒️ आशिष अंबादे, वर्धा जिल्हा प्रतिनिधी
मो. न. 8888630841
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- भारत राष्ट्र समिती ने वर्धा जिल्हात जोरदार संघटन बांधणीला सुरुवात केली आहे. त्यात हिंगणघाट, समुद्रपूर सह जिल्हातील इतर तालुक्यांत भारत राष्ट्र समितीच्या वतीने सदस्य नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे.
भारत राष्ट्र समितीच्या डॉ. उमेश वावरे यांच्या नेतृत्वात दुसरा टप्पाची समूद्रपूर तालुक्यातून सदस्य नोदणी अभियानाला सुरवात करण्यात आली. यावेळी भारतरत्न डाॅ बाबासाहेब आंबेडकर याच्या पूतळाला माल्यार्पण करून अब की बार किसान सरकार हा नारा देऊन दुसरा टप्पाचा सभासद नोदणीला सुरवात करून माहीती पुस्तके, पोस्टर दुकाना दुकानात वाटप करण्यात आले.

भारत राष्ट्र समिती आगामी होणाऱ्या निवडणुकी कडे लक्ष केंद्रीत करून सदस्य नोंदणी अभियान राबवित आहे. भारत राष्ट्र समिती आगामी काळात होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या 288 जागा व लोकसभा 48 जागा लढविनार आहे, तसेच गावा गावात जाऊन भारत राष्ट्र समितीचे सदस्य बनवायचे व त्यातुनच ग्राम पंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद, सर्व जागा लढविनार आहे.
यावेळी डॉ. उमेश वावरे म्हणाले की, भारत राष्ट्र समिती शेतकरी, सर्वसामान्य, गरीब सर्वांना घेऊन त्यांचा विकास कशा होईल यावर आमचा भर आहे. सर्व घटकांचा जेव्हा विकास होईल तेव्हाच राष्ट्र आणि राज्याची प्रगती होईल. आपल्या गावाचा, राज्याचा, देशाचा विचार करून भारत राष्ट्र समिती सदस्य मोहीमेत भाग घेवून सदस्य बनावे असे आव्हान डॉ. उमेश वावरे यांनी केले. यावेळी या सदस्य नोंदणी अभियाना सोबत मनिष कांबळे, राहुल मुन, प्रविण महाजन (उपसंरपंच) पाटर, चारू दत्त आटे, डाॅ. दुर्यस पासरे सर, सुजाता रामटेके, कोमल धवणे व कार्यकते उपस्थिति होते.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा. प्रशांत जगताप संपादक 9766445348-7385445348

