Sunday, December 7, 2025
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

मातंग समाजाच्या वृध्द शेतकऱ्याच्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादळला. सर्विकडे संतापाची लाट.

प्रशांत जगताप by प्रशांत जगताप
August 24, 2022
in क्राईम, देश विदेश, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, संपादकीय
0 0
0
मातंग समाजाच्या वृध्द शेतकऱ्याच्या हत्याकांडाने महाराष्ट्र हादळला. सर्विकडे संतापाची लाट.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

सहा जणांनी मिळून डोक्यात पाठीमागून कुऱ्हाडीचे वार करत केली हत्या.

प्रशांत जगताप, महाराष्ट्र संदेश न्युज
औरंगाबाद:-
येथून संपूर्ण महाराष्ट्राला हादवणारी घटना समोर येत आहे. आज देशात मोठ्या प्रमाणात जातीवाद वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अनेक दलीत परिवारावर अन्याय अत्याचार वाढले आहे. अशीच एक घटना समोर आली आहे.

गायरान पडीत जमिनीच्या वादातून दाखल झालेला ॲट्रॉसिटीचा गुन्हा मागे घे म्हणत वृद्ध मातंग समाजाच्या शेतकऱ्याच्या डोक्यात पाठीमागून कुऱ्हाडीचे वार करू दि.18 ऑगस्ट ला निर्घृण हत्या करण्यात आली होती. जनार्दन कोंडिबा कसारे वय 56 वर्ष, रा. साईनगर, पिसादेवी असे हत्या करण्यात आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकरणातील सहापैकी चार आरोपींना ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस उपाधीक्षक जयदत्त भवर यांच्या पथकासह चिकलठाणा पोलिसांचे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. शिवाजी महादू औताडे, गिरिजा बाळू औताडे, महादू गंगाराम औताडे आणि भरत महादू औताडे रा. सर्व हर्सूल अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. बाळू महादू औताडे आणि बबन निवृत्ती रोडे हे दोघे आरोपी सध्या फरार आहेत. त्यांचा पोलिस शोध घेत आहे.

प्राप्त माहितीनुसार, पिसादेवी परिसरात नऊ एकर गायरान जमीन आहे. मागील 35 वर्षांपासून नऊ एकरांपैकी आठ एकर जमीन जनार्दन कसारे हे मातंग समाजातील शेतकरी शेती करत होते. तसेच एक एकर जमीन ही महादू गंगाराम औताडे याच्या ताब्यात आहे. या जमिनीवरूनच 2008 मध्ये आणि त्यानंतर कसारे आणि औताडे कुटुंबामध्ये वाद झाला होता. त्यात मातंग समाजाच्या शेतकऱ्याला जातीत शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली होती तेव्हा या प्रकरणात औताडे विरुद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. जनार्दन कसारे यांच्यावर 18 ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास कुऱ्हाडीने वार करून हत्या करण्यात आली.

मातंग समाजाच्या शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने वार केल्यानंतर त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्त बाहेर येत होते त्यांना तातडीने रिक्षाने घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. रात्री नऊ वाजेदरम्यान वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जनार्दन यांना मृत घोषित केले.

हत्याकांड घडवून आणणारे सहाही आरोपींना जो पर्यंत अटक करण्यात येत नाही, तोपर्यंत जनार्दन कसारे या वृद्ध शेतकऱ्याचा यांचा मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा कसारे कुटुंबीयांसह नातेवाईक, विविध संघटनांनी घेतला होता. अखेर काही मागण्या मान्य केल्याने कसारे यांचा मृतदेह दुपारी सव्वातीन वाजेदरम्यान स्वीकारला. मृतदेहावर साडेचार वाजेदरम्यान अंत्यसंस्कार करण्यात आले. मृत जनार्दन यांना दोन मुले आणि एक विवाहित मुलगी आहे.

पोलिसांनी 4 आरोपीला ठोकल्या बेळ्या..
संपूर्ण महाराष्ट्राला हादवणाऱ्या मातंग समाजाच्या शेतकऱ्याच्या हत्याकांडातील चार आरोपींना अटक करून चिकलठाणा पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने चारही आरोपींना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. काय म्हणाले पोलिस, प्रशासकीय अधिकारी. उपजिल्हाधिकारी रोडगे यांनी मृताच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहायता निधीतून मदतीसाठी प्रस्ताव पाठवू, गायरान जमिनीसंदर्भात तहसीलदार, तलाठी यांना पाहणीच्या सूचना देऊ असे सांगितले. तर मृताच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण देऊन पोलिस दलाकडून समाजकल्याण विभागाकडे प्रस्ताव पाठविणार असल्याचे भवर यांनी बोलताना सांगितले.

संताप, राग अन आक्रोश…

शुक्रवारी घाटी रुग्णालयात शवविच्छेदन विभागासमोर कसारे यांच्या कुटुंबीयासह नातेवाईक, विविध सामाजिक संघटनांची गर्दी झाली होती. आरोपींना अटक आणि गायरान जमिनी संदर्भातील ठोस निर्णय झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेत घाटीत राग, संताप व्यक्त करत कुटुंबीयांचा आक्रोश होता. घाटी रुग्णालयात पोलिसांचा मोठ्या प्रमाणात फौजफाटा लावण्यात आला होता.

Previous Post

संरक्षित असलेला दोन हजार मेट्रीक टन युरीया विक्रीकरिता मुक्त, जादा दराने विक्री झाल्यास शेतक-यांनी तक्रार करण्याचे आवाहन

Next Post

पोलिस स्टेशन देवळी येथील पथकाने नाकाबंदी दरम्यान पकडला ९ लाख रुपये किमतीचा अवैध दारुसाठा.

प्रशांत जगताप

प्रशांत जगताप

Next Post
पोलिस स्टेशन देवळी येथील पथकाने नाकाबंदी दरम्यान पकडला ९ लाख रुपये किमतीचा अवैध दारुसाठा.

पोलिस स्टेशन देवळी येथील पथकाने नाकाबंदी दरम्यान पकडला ९ लाख रुपये किमतीचा अवैध दारुसाठा.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Nov    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In