उषाताई कांबळे सांगली शहर प्रतिनीधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन मेहकर:- भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती निमित्त मिळवणुक का काढली यांचा राग मनात ठेवून अक्षय भालेराव या दलीत तरूनांचा गावातील काही जातंध व धर्मांध माथे फिरूनी त्याचा निर्घून खून केला. या घटनेचे पडसाद अख्या महाराष्ट्रात ऊमटले. गेल्या अनेक दिवसापासून राज्यात आंदोलनाचा भडका उडाला. बूलढाणा जिल्हात देखील वेगवेगळ्या आंबेडकरी संघटना एकञीत आल्या. या मोर्चात विधान सभेचे आमदार धिरज लिंगाडे, समाजभूषण माजी सभापती दिलीप जाधव महाराष्ट्र प्रदेश काॅग्रेसचे संजय राठोड, जयश्रीताई शेळके, आंबेडकरी चळवळीतले भीमशक्तीचे नेते भाई कैलास सूखधाने, पॅथर नेते भाई सोमचंद्रभाई दाभाडे, रिपब्लीकन सेनेचे यूवा प्रदेशाध्यक्ष भाई दिलीप खरात, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टिचे साहेबरावजी सरदार, भूमी मूक्ती मोर्चाचे भाई प्रदिप अंभोरे, भाई अशिषबाबा खरात, भीमशक्तीचे प्रतिक भैय्या जाधव, काॅग्रेसचे दत्ताभाऊ काकस, यूवा नेते शैलेश खेडेकर, समतेचे निळे वादळ संघटनेचे अरूनभाऊ डोंगरे, भाई विजयकांत गवई, रिपाईचे प्रा. सुनिल ईंगळे, भीमशक्तीचे आकाश कासारे, तथागत ग्रूप संघटनेचे मा.संदिप गवई,संतोष मेढे, प्रकाश सुखधाने यांचे सह अनेक नेते या मोर्चात सहभागी झाले होते.
यावेळी काॅग्रेस पक्षाने देखील मोर्चास पाठींबा दर्शवून सहभाग घेतला. बूलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयावर हा आक्रोश मोर्चा पोहचला. अक्षय भालेराव प्रकरणासह बूलढाणा जिल्ह्यातील अन्याय अत्याचाराचा पाढाच मोर्चाचे शिष्टमंडळाने जिल्हाधिका-यापूढे वाचून दाखवला. व दलिता वरिल अन्याय अत्याचाराचा त्वरीत प्रतीबंध करा असा आग्रह शिष्टमंडळाने धरला. यावेळी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्या बरोबर लवकरच बैठक घेवून देऊळगावराजा तालूक्यात झालेल्या अन्याया संदर्भात योग्य कारवाई करू असे आश्वासन दिले. या आक्रोश मोर्चात नेते, कार्यकर्ते, हजारो महिला ,पूरूष, भीमसैनिक व नागरीक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

