Monday, April 20, 2026
  • Login
महाराष्ट्र संदेश न्यूज़
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
No Result
View All Result
महाराष्ट्र संदेश न्यूज
No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
  • कोकण
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय
Home क्राईम

हिंगणघाट भूमि अभिलेख कार्यालयात भ्रष्ट्राचारचे माहेर घर, चिरीमिरी घेतल्या शिवाय होत नाही काम.

मनवेल शेळके by मनवेल शेळके
June 13, 2023
in क्राईम, महत्त्वाच्या बातम्या, महाराष्ट्र, वर्धा, विदर्भ, संपादकीय, हिंगणघाट
0 0
0
हिंगणघाट भूमि अभिलेख कार्यालयात भ्रष्ट्राचारचे माहेर घर, चिरीमिरी घेतल्या शिवाय होत नाही काम.
0
SHARES
0
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on Twitter

मुकेश चौधरी कार्यकारी संपादक

महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:- जिल्हातील हिंगणघाट येथील भूमी अभिलेख कार्यालय भष्ट्र प्रशासनाच माहेर घर म्हणून कार्य करत आहे. भूमी अभिलेख कार्यालयाच्या या हलगर्जी कारभारामुळे शेतकरी, सर्व सामान्य नागरिक आणि हिंगणघाट तालुक्यातील नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्र संदेश न्युजच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महसूल मंत्री यांना हिंगणघाट भूमी अभिलेख कार्यालयाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी म्हणून पत्र पाठवले आहे.

हिंगणघाट येथील भूमी अभिलेख कार्यालयात चिरीमिरी घेतल्या शिवाय कर्मचारी काम करत नाही. चिरीमिरी दिली की तुमचं काम झाल म्हणून समजा. नाही दिली तर आपल्या चप्पल घासायच काम सुरू ठेवा. असेच काहीसे चित्र दिसून येत आहे. या कर्मचाऱ्यांना चिरीमिरी दिली नाही तर साहेब बाहेर गेले आहे. अगोदर खूप काम बाकी आहे. कर्मचारी जागेवर नाही आहे. अशी उडवा उडवीची उत्तरे भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेले कर्मचारी नागरिकांना देत आहे. हे कर्मचारी नागरिकांचे काम करण्यासाठी पगार शासनाचा घेतात पण काम मात्र दलाली करणाऱ्या लोकांचे लवकर करून देतात.

दलाल जोमात.. कर्मचाऱ्यांची चांदी. सध्या हिंगणघाट येथील भूमी अभिलेख कार्यालयात दलाली करणाऱ्या दलालाचे काम जोमात सुरू आहे. त्यात कर्मचाऱ्याची मोठ्या प्रमाणात चांदी होत असल्यामुळे तुम्ही दलाला मार्फत येथे गेले की काम लवकर पूर्ण होते. तुम्ही स्वतःगेले की 3 महिन्याचे काम वर्ष भरावर गेले म्हणून समजा. तुम्ही कितीही चप्पला घासल्या तरीही तुमचं काम होत नाही.

कागद पत्र आमच्याकडे नसते… भूमी अभिलेख कार्यालयातील कर्मचारी आणि अधिकारी यांना कोणतेही कागद पत्राची मागणी केल्यास ते आमच्या कडे नसल्याचे सांगतात. वरून ते कागद पत्र गहाळ झाल्याचे सांगून पोलिसात तक्रार करण्यास सांगतात. पण त्यांना चिरमिरी देताच ते कागद पत्र काढून देतात. अश्या पद्धतीने या ठिकाणी काम सुरू असल्याने सामान्य नागरिक हैराण झाला आहे. चोर तर चोर वरून शिरजोर अश्या प्रकारे या ठिकाणी काम सुरू आहे. भूमी अभिलेख कार्यालयातील अश्या कार्यपद्धती ने लोकांची कामे खोळबली आहे आणि सर्व सामान्य लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. कागद पत्रे हरविल्याचे सांगतात आणि जेव्हा चीरमिरी दिल्या बरोबर तेच हरवलेले कागद पत्र तिथेच मिळतात. अश्या पद्धतीने इथे कार्य होत असल्यामुळे यावर आवर घालून सर्वसामान्यांना दिलास देण्याची मागणी करण्यात येत आहे.

सरकारी यंत्रणांशी संबंधित कामांसाठी लाच द्यावी लागू नये, सरकारच्या वतीने यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत. पण हिंगणघाट येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत कर्मचारी सरकारच्या या उपाययोजनाला काळे फसण्याच काम करत आहे. सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांनी भ्रष्टाचार करू नये, यासाठी भ्रष्टाचार विरोधी कायदा 2018 (सुधारित) अंमलात आणला. राज्यात त्याचा काहीसा परिणाम दिसत असला, तरी भ्रष्टाचाराची प्रकरणे कमी होताना दिसत नाहीत. रोज भ्रष्टाचार केल्या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने अनेक सरकारी अधिकारी – कर्मचाऱ्यांना बेड्या ठोकण्यात येत आहे.

हिंगणघाट येथील भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने पैश्याची मागणी केली तर महाराष्ट्र संदेश न्युजला संपर्क साधावा. अशा कर्मचाऱ्यांना भीक घालणे सोडले तर ते जागेवर येणार.

आपल्या परिसरातील बातम्या आणि चालू घडामोडी बघण्याकरिता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

Previous Post

विद्यार्थी देशाचे भविष्य बदलू शकतात प्राचार्य नितेश कराळे

Next Post

हिंगणघाटला जिल्ह्याचा व अल्लीपुर, मांडगाव, सिंदी रेल्वे या मोठया गांवाना तालुक्याचा दर्जा देण्यात यावा प्रहारचे गजू कुबडे यांची निवेदनातून मागणी.

मनवेल शेळके

मनवेल शेळके

Next Post
हिंगणघाटला जिल्ह्याचा व अल्लीपुर, मांडगाव, सिंदी रेल्वे या मोठया गांवाना तालुक्याचा दर्जा देण्यात यावा प्रहारचे गजू कुबडे यांची निवेदनातून मागणी.

हिंगणघाटला जिल्ह्याचा व अल्लीपुर, मांडगाव, सिंदी रेल्वे या मोठया गांवाना तालुक्याचा दर्जा देण्यात यावा प्रहारचे गजू कुबडे यांची निवेदनातून मागणी.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

तारखेनुसार बातमी पहा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Google+ Youtube RSS

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

No Result
View All Result
  • Home
  • महत्त्वाच्या बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
      • जालना
      • बीड
    • पश्चिम महाराष्ट्र
      • सातारा
      • सांगली
    • विदर्भ
      • अकोला
      • चंद्रपूर
      • वर्धा
      • गडचिरोली
      • यवतमाळ
      • हिंगणघाट
      • वाशिम
    • उत्तर महाराष्ट्र
      • नाशिक
      • जळगांव
  • कोकण
    • मुंबई
    • सिंधुदुर्ग
  • देश विदेश
  • क्राईम
  • क्रीडा
  • तंत्रज्ञान
  • आरोग्य
  • मनोरंजन
  • राजकीय
  • साहित्य /कविता
  • संपादकीय

© 2022 महाराष्ट्र संदेश न्यूज | All Right Reserved

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In