मुकेश चौधरी कार्यकारी संपादक
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा:– आषाढी एकादशी निमित्त दरवर्षी महाराष्ट्रातील लाखो भाविक पायदळ वारीने पंढरपूरला विठोबाच्या दर्शनाला जात असतात.असेच नागपूर येथून पंढरपूरला सायकल वरून निघालेल्या नऊ वारकऱ्यांचे स्वागत (दि. 23 जुन) रोजी जिल्हा शिवसेनेच्या वतीने करण्यात आले.
नागपूर येथून टायगर ग्रुप ऑफ एडव्हेंचर आणी क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 22 जुन रोजी वारीची सुरुवात करण्यात आली. नागपूर-वर्धा-यवतमाळ- नांदेड – लातूर – सोलापूर या मार्गाने 750 किलोमीटरचा प्रवास करून दि. 28 जुन रोजी पंढरपूरला पोहचणार आहे. या सायकल वारीमध्ये सायकलपटू रवींद्र तरारे, अतुल तपासे, प्रसाद देशपांडे, संदीप वैद्य, ओमप्रकाश डोर्लीकर, श्रीधर हातागडे, प्रमोद बुटले, रामभाऊ तांबुले, दिलीप राखे आदिनी जिल्हा शिवसेना संपर्क कार्यालयाला भेट दिली असता शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख राजेश सराफ यांनी पुष्पंगुच्छ देऊन स्वागत केले व पुढील सायकल वारी सुखरूप होण्याकरिता शुभेच्छा दिल्यात.
यावेळेस युवासेनेचे शार्दूल वांदिले तसेच मेडिकल्स असोशिएशनचे पदाधिकारी पंकज सराफ व यंग सायकल रायडर्सचे मंगेश दिवटे, भूषण तिमांडे, विशाल पोखरे, सचिन मेघे, वैभव बोरकुटे, सचिन गरपाल, प्रसाद पोटदुखे, मयुरेष गुळतकर, प्रसन्ना चौधरी यांची उपस्थिती होती.

