अनुपस्थित राहत असलेले मुख्याधिकरी महिनाभर ही नगर पालिकेत हजर राहण्याची केली मागणी…
प्रश्न मार्गी न लागल्यास सिंदी रेल्वे नगरपालिकेवर हजारोच्या संख्येने निघणार मोर्चा…
राकाँ पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांच्या नेतृत्वात सिंदी (रेल्वे) शहरातील नागरिकांनी दिले मुख्याधिकर्याना निवेदन…
प्रविण जगताप वर्धा उपजिल्हा प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन वर्धा :- जिल्हातील सिंदी रेल्वे नगर परिषदेच्या कर विभागानी कर आकारणी (घरटॅक्स) मध्ये एकदम ३५% नी वाढ केली. त्यामुळे येथील नागरिकांना याचा आर्थिक त्रास सहन करावा लागत आहे. घरगुती कर आकारणी मध्ये दरवर्षी ४ ते ५ % ने वाढ होत असल्यास सामान्य नागरीक हा कर सहजरित्या भरु शकतो. परंतु प्रशासनाने त्या करात (टॅक्स) एकदम ३५% ने वाढ केली आहे. पण ती वाढ कोणत्या आधारावर करण्यात आली व ही वाढ नगर पालिकेच्या कोणत्या नियमांत बसत आहे ? याकडे नगर परिषद प्रशासनाने ताबडतोब लक्ष देवून त्या करामध्ये कपात करुन तो कर सामान्य नागरिकांकडून ५% आकारण्यात यावा. असे खडेबोल अतुल वांदिले यांनी नगर परिषद प्रशासनाला सुनावले.
सिंधी रेल्वे येथील नगर पालिका धूळखात आहे इथे मुख्याधिकारी महिना – महिना भर नगर पालिकेत बसत नाही येथील स्टाप ही कमी लोकांचा आहे. मग सिंधी रेल्वे शहरातील सामान्य जनतेनी स्वतःचे प्रश्न सोडवायचे कोणाकडे याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. तसेच मुख्याधिकारी यांनी ३० दिवस नगर पालिकेत हजर रहावे. याकडेही लक्ष देण्याची फार गरज आहे त्यातूनच सामान्य नागरिकांचे प्रश्न सुटतील.
तसेच शहरात पाणी पुरवठा दोन दिवसा आड होत आहे तर कधी आठ-आठ दिवस पाणी पुरवठा होत नसल्याने येथील नागरीकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. याकडे न.पा. प्रशासनाने गांर्भियाने लक्ष देवून दहा दिवसात प्रश्न मार्गी लावावे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नागरिकांसह रस्त्यावर उतरुन आंदोलन करेल व याची सर्वस्वी जबाबदारी ही न.पा. प्रशासनाची राहील याची नोंद घ्यावी.
यावेळी सामाजिक न्याय विभाग जिल्हा कार्याध्यक्ष प्रलयजी तेलंग, माजी नगराध्यक्ष तथा माजी सभापती कृ.उ.बा.स. बबनरावजी हिंगनेकर, शहराध्यक्ष गंगाधर कलोडे, माजी उपाध्यक्ष न.प.सुधाकरराव खेडकर, प्राचार्य तथा माजी उपाध्यक्ष अशोकजी कलोडे, जिल्हा सरचिटणीस दशरथजी ठाकरे, अमोल बोरकर, वसंताजी सिर्से, गजाननराव डबारे, प्रकाश सोनटक्के, युवा शहर अध्यक्ष तुषार हिंगणेकर, अल्पसंख्याक सेल अध्यक्ष बबलू खान, सुनील शेंडे, प्रकाश, अशोक सातपुते, रवी राणा, युगल अवचट, मनोहर चंदनखडे, सुनील भुते, पप्पू आष्टीकर, विरेंद्र उर्फ बब्बा देशमुख, संदीप ठमके यांचासह सिंधी येथील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

