राहुल मसुरे, जिवती तालुका प्रतिनिधी
महाराष्ट्र संदेश न्युज ! ऑनलाईन जिवती/मुंबई:- राज्यातील गायरान व गावठान अतिक्रमण धारकांच्या जमिनीशी निगडीत असलेल्या प्रश्ना संदर्भात 20 जुलैला वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली सकाळी 11 वाजता भायखळा ते मंत्रालयापर्यत महामोर्चा पायी चालत होणार आहे,
वंचित बहुजन आघाडी ने जनतेच्या वाढत्या गरजाचां व सरकारचे दुर्लक्ष होत असलेल्या विषयाची दख्खल घेऊन हिवाळी अधिवेशनात मंत्रालयावर महा मोर्चा घेऊन जाण्याचा निर्णय घेऊन २० जुलै रोजी आयोजन केले आहे. अनेक वर्षांपासून रखडत असलेल्या अडचणी मोर्चाच्या माध्यमातून मांडत आहेत त्यात प्रमुख मागण्या गावरान धारक शासकीय / जमीनी अतीक्रमन धारकाच्या नावे नियमाकुल करा तसेच गावरान धारकांना भुमीहिनाच्या शेतीचा सातबारा द्या. बेघर अनुसूचित जाती जमाती आदीवासी भटक्या विमुक्त भुमीहिनांना घरकुलाचा लाभ देतजागा सरसकट 7/12 मालकी हक्काचा करा व कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना अंतर्गत जमीनी देत त्यासाठी कालबद्ध कृती कार्यक्रम शासनाने राबवावा आणखी शेवटची मागणी गायरानाच्या प्रलंबीत प्रकरणाचा सकारात्मक पद्धतीने भुमीका घेत दावेदारानां जमीनी देण्यात याव्यात अशा प्रकारच्या मोर्चात मागण्या करण्यात येणार आहे.
मोर्चाचे नेतृत्व वंचित बहुजन आघाडी चे संस्थापक अड. बाळासाहेब आंबेडकर करणार असुन मोर्चात वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश अध्यक्षा रेखाताई ठाकुर तसेच युवानेते सुजाताला आंबेडकर तसेच भारिप बहुजन महासंघाचे प्रदेश अध्यक्ष अशोक भाऊ सोनोने, वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष निलेश विश्वकर्मा व संपुर्ण महाराष्ट्रातील पदाधीकारी व कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत.
आपल्या परिसरातील बातम्या करीता आजच संपर्क साधावा प्रशांत जगताप संपादक 9766445348/7385445348

